शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

कोळशाच्या आकडेवारीचा घोळ

By admin | Updated: January 29, 2016 04:22 IST

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोळसा मंत्रालयाचे मुख्य सचिव अनिल स्वरूप यांनी कोळसा खाणींच्या लिलावातून सरकारला २.०७ लाख कोटी रुपये महसूल

- सोपान पांढरीपांडे,  नागपूर

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोळसा मंत्रालयाचे मुख्य सचिव अनिल स्वरूप यांनी कोळसा खाणींच्या लिलावातून सरकारला २.०७ लाख कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याचा दावा केला होता. परंतु आता लोकमत माध्यम समूहाला माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या उत्तरात कोळसा मंत्रालयानेच आपला हा दावा नाकारला असून २९ कोळसा खाणींच्या लिलावातून केवळ १३९८ कोटी रुपये महसूल मिळाल्याचे कबूल केले आहे.मग २.०७ लाख कोटी आले कुठून?पंतप्रधान मोदी आणि कोळसा सचिव यांनी २.०७ लाख कोटी रुपयांचा आकडा कुठून आणला याचीही लोकमतने चौकशी केली. कोळशाचे भूमिगत साठे असलेल्या आठ राज्य सरकारांना दरवर्षी मिळणाऱ्या ‘रॉयल्टी’च्या अंदाजित महसुलाच्या आधारे हा भला मोठा दावा करण्यात उघड झाले. भारतात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या आठ राज्यांत कोळशांचे साठे आहेत. या राज्य सरकारांना लिलाव केलेल्या २९ खाणींमधून दरवर्षी ६२८४ कोटी रुपये रॉयल्टी मिळेल व खाणींचे आयुष्य ३० वर्षे असल्याने पुढील ३० वर्षांत एकूण रॉयल्टीपोटी १.८८ लाख रुपये व इतर तत्सम महसूल १९००० कोटी असे २.०७ लाख कोटी रुपये महसूल मिळेल असे हे ‘गणित’ होते.२०१२ साली तत्कालीन मुख्य लेखाकार विनोद राय यांनी कोळसा खाणींच्या वाटपातून सरकारला १.८६ लाख कोटी नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. केवळ २९ खाणींच्या लिलावातून त्यापेक्षा जास्त महसूल मिळाल्याचा दावाही पंतप्रधान मोदी व कोळसा सचिव अनिल स्वरूप यांनी केला होता. याच बरोबर कोळसा खाणींच्या लिलावामुळे वीज केंद्रांना कोळसा विनासायास मिळेल व वीज स्वस्त होऊन सामान्य जनतेला ९६९७१ कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष लाभ मिळेल, असा दावाही कोळसा मंत्रालयाने केला होता. परंतु माहितीच्या अधिकारातील उत्तरामुळे कोळसा खाणींचा महसूल २.०७ लाख कोटी रुपये नाही व अप्रत्यक्ष लाभही ९६९७१ कोटी रुपये मिळणार नाही, हे उघड झाले आहे.लोकमत समूहाचा अर्जलोकमत समूहाने कोळसा खाणींच्या लिलावासंबंधी एकूण १३ मुद्द्यांवर माहिती मागणारा अर्ज २ नोव्हेंबर २०१५ रोजी कोळसा मंत्रालयाकडे सादर केला होता. या अर्जाला मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी किशोर चौधरी यांनी २२ डिसेंबर २०१५ रोजी मुद्देसूद उत्तर दिले आहे.कोळसा मंत्रालयाचे उत्तरलोकमत समूहाने आपल्या अर्जात सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली रद्द केलेल्या २०४ कोळसा खाणींपैकी किती खाणींचा सरकारने लिलाव केला व त्यापासून २०१४-१५मध्ये सरकारला किती महसूल मिळाला, असा नेमका प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना कोळसा मंत्रालयाने २०१४-१५ या वर्षात २९ कोळसा खाणींचा लिलाव केला असून त्यापासून १३९८ कोटी रुपये महसूल मिळाल्याचे कबूल केले आहे.