शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता : राज्यपाल विद्यासागर राव, सहकार पुरस्काराचे सोलापूरात वितरण

By admin | Updated: April 26, 2017 17:35 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. २६ :- सहकार क्षेत्रापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता असून सहकारी संस्थांचे व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली.राज्य शासनाच्या सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्काराचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. जुळे सोलापूर येथील अंबर मैदानावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, ह्य सहकार चळवळ देशासाठी वरदान ठरेल, असे भाकित महात्मा गांधी यांनी केले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु सहकार चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. देशात सहा लाख सहकारी संस्था असून महाराष्ट्रात दोन लाखांवर संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या ठेवी आणि भांडवल फार मोठे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून साडेचार लाख लोकांना रोजगार मिळाला आहे़सहकार चळवळीने राज्याच्या सर्वसमावेशक, सामाजिक आणि आर्थिंक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे, असे नमूद करुन राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, केवळ कृषी पतपुरवठ्यापुरती मयार्दीत असणारी सहकार चळवळ आज बँकींग, पतसंस्था, साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, मत्स्य उत्पादन, पणन, अन्नपक्रिया, वस्त्रोद्योग, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात विस्तारली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्येही योगदान दिले आहे.राज्य शासनाने अलिकडच्या काळात सहकार चळवळीच्या विकासासाठी काही ठोस निर्णय घेतले आहेत. सहकार विभागाने सेवा हमी हक्क कायद्याखाली पाच सेवांचा समावेश केल्याबद्दल सहकार विभाग कौतुकास पात्र आहे, असेही राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, ग्रामीण भागाशी सर्वाधिक जोडल्या गेलेल्या सहकार क्षेत्राची सध्याची व्यवस्था कठीण आहे. सहकार क्षेत्र स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार क्षेत्रात रुग्णालये सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन नीट व्हावे आणि ही चळवळ अधिक मजबूत व्हावी यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सहकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 38 संस्थांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, सहकार आयुक्त व निबंधक, सह.संस्था संभाजी कडू - पाटील, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.