शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहकार चळवळ संकटात

By admin | Updated: July 7, 2014 01:10 IST

सहकारी बँकांनी नेहमीच गरीब व गरजूंची मदत केली. त्यांना कर्ज दिले. अनेकांना आपल्या पायावर उभे केले. छोट्या उद्योगांना चालना दिली. पण आज तीच विदर्भातील सहकार चळवळ संकटात सापडली आहे,

स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार सोहळा : नितीन गडकरी यांची खंत नागपूर : सहकारी बँकांनी नेहमीच गरीब व गरजूंची मदत केली. त्यांना कर्ज दिले. अनेकांना आपल्या पायावर उभे केले. छोट्या उद्योगांना चालना दिली. पण आज तीच विदर्भातील सहकार चळवळ संकटात सापडली आहे, याची खंत वाटत असल्याची भावना केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मानव मंदिर संस्थेच्यावतीने रविवारी स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, मानव मंदिर संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी, अ‍ॅड़ निशांत गांधी व सत्कारमूर्ती रवींद्र दुरुगकर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून,कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यानंतर नितीन गडकरी यांच्या हस्ते रवींद्र दुरुगकर यांना रोख ११ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. गडकरी पुढे म्हणाले, महाराष्ट्र व गुजरातमधील सहकार क्षेत्रात अनेक चांगली कामे झाली आहेत. मात्र असे असताना दिल्ली सरकारच्या मनात या क्षेत्राविषयी संभ्रम आहे. रवींद्र दुरुगकर यांनी विदर्भातील सहकार क्षेत्राला बळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता या क्षेत्राला त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. सध्या सहकार क्षेत्रात काम करणे फार कठीण झाले आहे. भांडवल बँकेचे असते, परिश्रमही बँकच घेते, मात्र त्यावर अधिकार डीडीआर गाजवितो. त्यामुळे सहकार कायद्यात सुधारणा करून तो बदलविणे आवश्यक आहे. शिवाय सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राने हा प्रयोग सुरू केला असून, त्याचा गुणात्मक परिणाम दिसू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गडकरी नसते तर आपणही भाजपात नसतोकाँग्रेस पक्ष सोडून नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार दत्ता मेघे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करताच, कदाचित गडकरी नसते तर आपणही भाजपात गेलो नसतो, असे सांगितले. शिवाय आपण अलीकडे कमी बोलून समाजातील चांगल्या लोकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरी यांचा विश्वास व त्यांची काम करण्याची पद्घत याचा अभिमान वाटतो. गत काही दिवसांपासून मी काँग्रेस सोडणार, भाजपात जाणार, अशी मुद्दाम चर्चा केली जात होती. त्यामुळे कुणी धक्का देण्यापूर्वी स्वत: बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.