शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

सहकार चळवळ संकटात

By admin | Updated: July 7, 2014 01:10 IST

सहकारी बँकांनी नेहमीच गरीब व गरजूंची मदत केली. त्यांना कर्ज दिले. अनेकांना आपल्या पायावर उभे केले. छोट्या उद्योगांना चालना दिली. पण आज तीच विदर्भातील सहकार चळवळ संकटात सापडली आहे,

स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार सोहळा : नितीन गडकरी यांची खंत नागपूर : सहकारी बँकांनी नेहमीच गरीब व गरजूंची मदत केली. त्यांना कर्ज दिले. अनेकांना आपल्या पायावर उभे केले. छोट्या उद्योगांना चालना दिली. पण आज तीच विदर्भातील सहकार चळवळ संकटात सापडली आहे, याची खंत वाटत असल्याची भावना केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मानव मंदिर संस्थेच्यावतीने रविवारी स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, मानव मंदिर संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी, अ‍ॅड़ निशांत गांधी व सत्कारमूर्ती रवींद्र दुरुगकर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून,कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यानंतर नितीन गडकरी यांच्या हस्ते रवींद्र दुरुगकर यांना रोख ११ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. गडकरी पुढे म्हणाले, महाराष्ट्र व गुजरातमधील सहकार क्षेत्रात अनेक चांगली कामे झाली आहेत. मात्र असे असताना दिल्ली सरकारच्या मनात या क्षेत्राविषयी संभ्रम आहे. रवींद्र दुरुगकर यांनी विदर्भातील सहकार क्षेत्राला बळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता या क्षेत्राला त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. सध्या सहकार क्षेत्रात काम करणे फार कठीण झाले आहे. भांडवल बँकेचे असते, परिश्रमही बँकच घेते, मात्र त्यावर अधिकार डीडीआर गाजवितो. त्यामुळे सहकार कायद्यात सुधारणा करून तो बदलविणे आवश्यक आहे. शिवाय सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राने हा प्रयोग सुरू केला असून, त्याचा गुणात्मक परिणाम दिसू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गडकरी नसते तर आपणही भाजपात नसतोकाँग्रेस पक्ष सोडून नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार दत्ता मेघे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करताच, कदाचित गडकरी नसते तर आपणही भाजपात गेलो नसतो, असे सांगितले. शिवाय आपण अलीकडे कमी बोलून समाजातील चांगल्या लोकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरी यांचा विश्वास व त्यांची काम करण्याची पद्घत याचा अभिमान वाटतो. गत काही दिवसांपासून मी काँग्रेस सोडणार, भाजपात जाणार, अशी मुद्दाम चर्चा केली जात होती. त्यामुळे कुणी धक्का देण्यापूर्वी स्वत: बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.