शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

किरणोत्सवाला ढगांचा अडथळा

By admin | Updated: February 2, 2016 04:06 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली. पहिल्या दिवशी (रविवारी) सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हीच सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती, पण सूर्यकिरणे साडेपाच वाजेपर्यंत मंदिराच्या पश्चिमद्वार महाद्वाराला स्पर्श करून गायब झाली. मंगळवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये बाहेरगावांहून आलेल्या भाविकांची संख्या मोठी होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या किरणोत्सवात महाद्वार रोड ते रंकाळा टॉवर या रस्त्यावरील इमारती, मोबाइल टॉवर, जाहिराती फलक यांचा अडथळा येत होता. हे किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेला कळविले होते. त्यामुळे यातील काही अडथळे हटवण्यात आले होते. त्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी मंदिरात प्रवेश करत थेट अंबाबाई देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श केला. किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. तरीही साडेपाच वाजता मंदिराच्या पश्चिमद्वारापर्यंत सूर्यकिरणे पोहोचली. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे किरणातील घनताचे प्रमाण कमी असल्याने किरणोत्सव झाला नाही.ही सूर्यकिरणे सायंकाळी ६.१० वाजता देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, अशी माहिती प्रा. डॉ. एम.एम. कारंजकर यांनी दिली. या वेळी केआयटी कॉलेजचे प्रा. किशोर हिरासकर, चंद्रकांत परुळेकर यांच्यासह केआयटीचे विद्यार्थी, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)