शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

बालचित्रवाणी बंद करण्यावर अखेर शिक्कामोर्तब

By admin | Updated: September 12, 2016 19:02 IST

राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी बंद करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ -  राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी बंद करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) ई-लर्निंग शाखा म्हणून बालचित्रवाणीचे विलीनीकरणे केले जाणार आहे. 
‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दुरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच उपयोग नाही’, असे स्पष्ट शब्दात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणी बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
मागील काही वर्षांत ‘बालचित्रवाणी’ची स्थिती दयनीय झाली होती. निधी अभावी कर्मचा-यांचे महिनोमहिने वेतन न होणे, नवीन यंत्रणांचा अभाव, नवीन कार्यक्रमांची ठप्प झालेली निर्मिती यांमुळे बालचित्रवाणी अखेरची घटका मोजत होती. त्यामुळे शिक्षण विभागाची ही महत्वाची संस्था बंद होणार की राज्य सरकार त्याची जबाबदारी स्वीकारून पुनरुज्जीवन करणार, यावर सातत्याने चर्चा होत होती. सोमवारी शिक्षणमंत्री तावडे यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी बालचित्रवाणी बंद करण्याचे स्पष्ट संकेत दिले. 
याविषयी तावडे यांना विचारले असता ते म्हणाले, बालचित्रवाणी हे युनिट आता ई-लर्निंग म्हणून जगविणे गरजेचे आहे. त्याला योग्य अधिकार दिले पाहिजेत. पण बालचित्रवाणी ज्या नियमाने बनले आहे, त्यातून ते होणार नाही. त्यामुळे बालभारतीबरोबर एकत्र करून ते करता आले तर बालभारतीचा नफा सुरूवातीला त्यामध्ये देता येईल. 
त्यानंतर दोन वर्षांनी बालचित्रवाणी जो बालभारतीचा ई-लर्निंग विभाग होईल, तो स्वत:चे उत्पन्न मिळवू शकेल. आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दुरदर्शनवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काही उपयोग नाही. काळानुरूप शिक्षण बदलले पाहिजे. त्यामुळे बहुधा ई-लर्निंग विभाग सुरू केला तर कालांतराने अजून २० वर्षांनी बालभारतीचा छपाई विभाग बंद होईल आणि ई-लर्निंगच चालेल. त्यामुळे आपण पुढे जावून विचार केला पाहिजे. 
एखाद्या संस्थेबाबत उगाचच भावनिक होवून त्या संस्थेचे नुकसान करण्यापेक्षा काळानुरूप ती कशी बदलून टिकविता येईल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता येईल, यावर माझा जोर आहे, असे तावडे यांनी स्पष्टपणे सांगितले. 
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून थकलेले कर्मचाºयांचे वेतन काढण्याचे आदेश देण्यात आले असून ती प्रक्रिया सुरू आहे. तेथील कर्मचारी टिकविणे त्यांना बदलत्या काळानुसार प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे, असे तावडे म्हणाले. 
 
बालचित्रवाणीविषयी थोडेसे... 
केंद्र सरकारने १९८४ मध्ये महाराष्ट्रासह देशातील ६ राज्यांमध्ये बालचित्रवाणीची स्थापना केली. मातृभाषेतून मनोरंजन करत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडविणे हा या संस्थेचा उद्देश होता. त्यानुसार बालचित्रवाणीकडून विविध कार्यक्रमही तयार करण्यात येत होते. सुरूवातीला केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून संस्थेला निधी मिळत होता. स्थापनेनंतर ५ वर्षांनी राज्य शासनाने संस्थेची पूर्ण जबाबदारी घ्यायची असा निर्णय झाला होता. काही राज्यांनी ही जबाबदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ही जबाबदारी घेतली असली तरी संस्थेच्या विकासाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप तेव्हापासून सातत्याने होत आहे. दरम्यानच्या काळात बालचित्रवाणीचे दूरदर्शनवर प्रक्षेपण फेब्रुवारी २०१४ पासून बंद झाली. त्यामुळे कार्यक्रमांच्या निर्मितीलाही खीळ बसली. त्यामुळे बालचित्रवाणी पडण्याच्या चर्चेला उधाण आले होते.