शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

कल्हेमधील रुग्णालय बंद

By admin | Updated: March 4, 2017 02:49 IST

रानसईसह इतर आदिवासींसाठी जिल्हा परिषदेने कर्नाळ्याजवळील कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र सुरू केले होते

नवी मुंबई : रानसईसह इतर आदिवासींसाठी जिल्हा परिषदेने कर्नाळ्याजवळील कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र सुरू केले होते. पण येथे डॉक्टर व कर्मचारीच उपलब्ध करून दिले नसल्याने केंद्र बंद आहे. रुग्णालयाचे बांधकामही मोडकळीस आले असून आदिवासी महिलांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. पनवेल व उरण तालुक्याचे झपाट्याने शहरीकरण होवू लागले असले तरी या परिसरातील आदिवासी नागरिक अद्याप दारिद्र्याशी झुंज देत आहेत. रानसई परिसरातील बंगल्याची वाडी, खोंडेवाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी, खेरकाठी, भुऱ्याची वाडी या सहा आदिवासी वाड्यांमधील समस्यांवर ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासन जागे झाले. या परिसरामधील नागरिकांना त्यांच्या गावामध्ये रेशनिंगचे धान्य वाटप सुरू झाले आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. गावामध्ये जाणाऱ्या रोडची स्थिती अद्याप बिकट असून आरोग्य हा सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींना प्राथमिक उपचार घेण्यासाठीही ७ ते १० किलोमीटर दूर जावे लागत आहे. गर्भवती महिलांना उपचारासाठी एकही सरकारी रुग्णालय जवळ नाही. यामुळे अनेक वेळा रुग्णालयात घेवून जात असताना वाटेमध्येच महिलांची प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह सुरू केले होते. आदिवासी महिला व नवजात अर्भकांचा मृत्यू होवू नये व त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने ही उपाययोजना केली होती. याशिवाय कल्हे गाव, त्या परिसरातील इतर आदिवासी पाडे आणि गावांनाही याचा लाभ होणार होता. पण दुर्दैवाने हे रुग्णालय सुरूच झालेले नाही. जिल्हा परिषदेने १९८६ - ८७ मध्ये बांधलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतीचा वापरच करण्यात येत नाही. यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी छपराला भगदाड पडले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीलाही टाळे आहे. यामुळे त्या इमारतीचेही खंडर होवू लागले आहे. आदिवासी नागरिकांसाठी कल्हे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह सुरू केले तर त्याचा लाभ सर्वच नागरिकांना होवू शकतो. यामुळे जिल्हा परिषदेने पुन्हा हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा. या ठिकाणी निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. आदिवासी पाड्यांमध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा प्रत्यक्ष पाड्यांवर ओपीडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी नागरिक करत आहेत. वैद्यकीय सुविधाच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी पेण किंवा पनवेलला घेवून जावे लागत आहे. (प्रतिनिधी)