शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
7
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
8
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
9
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
10
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
11
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
12
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
13
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
14
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
15
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
16
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
17
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
18
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
19
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
20
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कल्हेमधील रुग्णालय बंद

By admin | Updated: March 4, 2017 02:49 IST

रानसईसह इतर आदिवासींसाठी जिल्हा परिषदेने कर्नाळ्याजवळील कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र सुरू केले होते

नवी मुंबई : रानसईसह इतर आदिवासींसाठी जिल्हा परिषदेने कर्नाळ्याजवळील कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र सुरू केले होते. पण येथे डॉक्टर व कर्मचारीच उपलब्ध करून दिले नसल्याने केंद्र बंद आहे. रुग्णालयाचे बांधकामही मोडकळीस आले असून आदिवासी महिलांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. पनवेल व उरण तालुक्याचे झपाट्याने शहरीकरण होवू लागले असले तरी या परिसरातील आदिवासी नागरिक अद्याप दारिद्र्याशी झुंज देत आहेत. रानसई परिसरातील बंगल्याची वाडी, खोंडेवाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी, खेरकाठी, भुऱ्याची वाडी या सहा आदिवासी वाड्यांमधील समस्यांवर ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासन जागे झाले. या परिसरामधील नागरिकांना त्यांच्या गावामध्ये रेशनिंगचे धान्य वाटप सुरू झाले आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. गावामध्ये जाणाऱ्या रोडची स्थिती अद्याप बिकट असून आरोग्य हा सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींना प्राथमिक उपचार घेण्यासाठीही ७ ते १० किलोमीटर दूर जावे लागत आहे. गर्भवती महिलांना उपचारासाठी एकही सरकारी रुग्णालय जवळ नाही. यामुळे अनेक वेळा रुग्णालयात घेवून जात असताना वाटेमध्येच महिलांची प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह सुरू केले होते. आदिवासी महिला व नवजात अर्भकांचा मृत्यू होवू नये व त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने ही उपाययोजना केली होती. याशिवाय कल्हे गाव, त्या परिसरातील इतर आदिवासी पाडे आणि गावांनाही याचा लाभ होणार होता. पण दुर्दैवाने हे रुग्णालय सुरूच झालेले नाही. जिल्हा परिषदेने १९८६ - ८७ मध्ये बांधलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतीचा वापरच करण्यात येत नाही. यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी छपराला भगदाड पडले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीलाही टाळे आहे. यामुळे त्या इमारतीचेही खंडर होवू लागले आहे. आदिवासी नागरिकांसाठी कल्हे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह सुरू केले तर त्याचा लाभ सर्वच नागरिकांना होवू शकतो. यामुळे जिल्हा परिषदेने पुन्हा हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा. या ठिकाणी निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. आदिवासी पाड्यांमध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा प्रत्यक्ष पाड्यांवर ओपीडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी नागरिक करत आहेत. वैद्यकीय सुविधाच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी पेण किंवा पनवेलला घेवून जावे लागत आहे. (प्रतिनिधी)