शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

विद्यार्थी संख्येअभावी ३५ शाळा बंद

By admin | Updated: July 12, 2017 01:56 IST

विद्यार्थी संख्येअभावी मराठी व इतर भाषिक अशा ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विद्यार्थी संख्येअभावी मराठी व इतर भाषिक अशा ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र या बंद पडलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालवण्यास देऊन त्यात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत होते. मात्र विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. या गळतीचा फटका ३५ शाळांना बसला आहे. शाळा बंद पडल्याने या शाळांमधून इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्याचे धोरण पालिका प्रशासनाने बनवले आहे. त्यानुसार या शाळा खाजगी संस्था चालवणार आहेत. शाळांमध्ये मुख्याध्यापक पालिकेचा व शिक्षक मात्र खाजगी संस्थांचे असणार आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना महापालिका शाळांप्रमाणे मोफत २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. नव्या धोरणानुसार गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे. गटनेत्यांच्या बैठकीत शाळांच्या खाजगीकरणाचा हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर करून घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. >नि:शुल्क शिक्षणया ३५ शाळांमध्ये मुख्याध्यापक हा पालिकेचा असणार आहे. शिक्षकांचा पगार हा खासगी संस्था देणार आहे. त्यावर नियंत्रण हे पालिकेचे असेल. विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिले जाणार असल्यामुळे या शाळा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सभागृह नेता यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.>शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम उघड मराठी शाळा बंद होण्यास शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी केला आहे. मराठी नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. तरीही मराठीचा अट्टहास धरणाऱ्या शिवसेनेला मराठी भाषेच्या शाळा वाचवता आल्या नाहीत. शिवसेना प्रशासनाच्या हाताचे बाहुले बनले असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. मराठीचा आग्रह मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत या खासगी संस्थांतर्फे सुरु होणाऱ्या शाळा मराठी माध्यमाच्याच असाव्यात, असा आग्रह धरला आहे. पहारेकरीही नाराज : यापूर्वी आयबीच्या शाळांना पालिकेने वर्ग दिले होते. परंतु, याठिकाणी शालेय इमारतीच देत आहोत. त्यामुळे या शाळा संस्थांची संस्थाने होतील अशी भीती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांंनी व्यक्त केली. मुख्याध्यापक हा महापालिकेचा असेल. परंतु, त्यांच्या अखत्यारितील शिक्षक हा खासगी असल्याने त्या शिक्षकांवर मुख्याध्यापकाचे काय नियंत्रण राहील? याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.