शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

विद्यार्थी संख्येअभावी ३५ शाळा बंद

By admin | Updated: July 12, 2017 01:56 IST

विद्यार्थी संख्येअभावी मराठी व इतर भाषिक अशा ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विद्यार्थी संख्येअभावी मराठी व इतर भाषिक अशा ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र या बंद पडलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालवण्यास देऊन त्यात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत होते. मात्र विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. या गळतीचा फटका ३५ शाळांना बसला आहे. शाळा बंद पडल्याने या शाळांमधून इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्याचे धोरण पालिका प्रशासनाने बनवले आहे. त्यानुसार या शाळा खाजगी संस्था चालवणार आहेत. शाळांमध्ये मुख्याध्यापक पालिकेचा व शिक्षक मात्र खाजगी संस्थांचे असणार आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना महापालिका शाळांप्रमाणे मोफत २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. नव्या धोरणानुसार गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे. गटनेत्यांच्या बैठकीत शाळांच्या खाजगीकरणाचा हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर करून घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. >नि:शुल्क शिक्षणया ३५ शाळांमध्ये मुख्याध्यापक हा पालिकेचा असणार आहे. शिक्षकांचा पगार हा खासगी संस्था देणार आहे. त्यावर नियंत्रण हे पालिकेचे असेल. विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिले जाणार असल्यामुळे या शाळा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सभागृह नेता यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.>शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम उघड मराठी शाळा बंद होण्यास शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी केला आहे. मराठी नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. तरीही मराठीचा अट्टहास धरणाऱ्या शिवसेनेला मराठी भाषेच्या शाळा वाचवता आल्या नाहीत. शिवसेना प्रशासनाच्या हाताचे बाहुले बनले असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. मराठीचा आग्रह मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत या खासगी संस्थांतर्फे सुरु होणाऱ्या शाळा मराठी माध्यमाच्याच असाव्यात, असा आग्रह धरला आहे. पहारेकरीही नाराज : यापूर्वी आयबीच्या शाळांना पालिकेने वर्ग दिले होते. परंतु, याठिकाणी शालेय इमारतीच देत आहोत. त्यामुळे या शाळा संस्थांची संस्थाने होतील अशी भीती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांंनी व्यक्त केली. मुख्याध्यापक हा महापालिकेचा असेल. परंतु, त्यांच्या अखत्यारितील शिक्षक हा खासगी असल्याने त्या शिक्षकांवर मुख्याध्यापकाचे काय नियंत्रण राहील? याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.