शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आलेमावना राष्ट्रवादीची दारे बंद

By admin | Updated: December 25, 2015 03:45 IST

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला

राजू नायक, पुणेगोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकांशी वार्तालाप केला. त्यात चर्चिल आलेमाव यांना पक्षात घेण्यास आपण स्वत:च अनुकूल नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश देण्याची माझी इच्छा नाही. त्यांचे नावही खराब आहे!, अशा शब्दांत पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आलेमाव यांना पुन्हा पक्षात घेण्यास काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीच आलेमाव यांना राष्ट्रवादीची दिशा दाखवल्याची वदंता आहे. आलेमाव यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी आणि नावेली मतदारसंघातून विधानसभेत पुनर्प्रवेश करण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी फालेरो यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राजकीय विजनवासातून बाहेर येण्यासाठी मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळवण्याचे चर्चिल यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर आलेमाव यांनी गोव्यात कोणतेही स्थान नसलेल्या ‘तृणमूल काँग्रेस’मध्ये प्रवेश करून दक्षिण गोव्यातून उमेदवारी दाखल केली. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला अपशकुन करण्याचा हा डाव होता. आलेमाव यांनी आधीही त्यांच्या पक्षाला अडचणीत आणले असून त्यांचा हा पूर्वेतिहास माहीत असल्यानेच त्यांचा प्रवेश पवारांनी रोखला आहे.काँग्रेसशी आघाडीत स्वारस्यराष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील भवितव्य काय?, यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातही अनेक वर्षे राहिली आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता उपभोगता आली. मात्र, अलीकडील काळात काँग्रेसने राष्ट्रवादीशी फटकून राहण्याचे धोरण अवलंबिले असून परिणामी दोन्ही पक्षांना सत्ता गमवावी लागली. काँग्रेसशी असलेली आघाडी राखण्यात राष्ट्रवादीला स्वारस्य असून तेच देशाच्या आणि गोव्याच्याही हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.