शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

आलेमावना राष्ट्रवादीची दारे बंद

By admin | Updated: December 25, 2015 03:45 IST

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला

राजू नायक, पुणेगोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकांशी वार्तालाप केला. त्यात चर्चिल आलेमाव यांना पक्षात घेण्यास आपण स्वत:च अनुकूल नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश देण्याची माझी इच्छा नाही. त्यांचे नावही खराब आहे!, अशा शब्दांत पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आलेमाव यांना पुन्हा पक्षात घेण्यास काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीच आलेमाव यांना राष्ट्रवादीची दिशा दाखवल्याची वदंता आहे. आलेमाव यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी आणि नावेली मतदारसंघातून विधानसभेत पुनर्प्रवेश करण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी फालेरो यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राजकीय विजनवासातून बाहेर येण्यासाठी मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळवण्याचे चर्चिल यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर आलेमाव यांनी गोव्यात कोणतेही स्थान नसलेल्या ‘तृणमूल काँग्रेस’मध्ये प्रवेश करून दक्षिण गोव्यातून उमेदवारी दाखल केली. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला अपशकुन करण्याचा हा डाव होता. आलेमाव यांनी आधीही त्यांच्या पक्षाला अडचणीत आणले असून त्यांचा हा पूर्वेतिहास माहीत असल्यानेच त्यांचा प्रवेश पवारांनी रोखला आहे.काँग्रेसशी आघाडीत स्वारस्यराष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील भवितव्य काय?, यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातही अनेक वर्षे राहिली आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता उपभोगता आली. मात्र, अलीकडील काळात काँग्रेसने राष्ट्रवादीशी फटकून राहण्याचे धोरण अवलंबिले असून परिणामी दोन्ही पक्षांना सत्ता गमवावी लागली. काँग्रेसशी असलेली आघाडी राखण्यात राष्ट्रवादीला स्वारस्य असून तेच देशाच्या आणि गोव्याच्याही हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.