शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

पाण्याअभावी लातुरातील शस्त्रक्रियागृह बंद

By admin | Updated: February 2, 2016 04:10 IST

मराठवाड्यात पाणी संकट गहिरे झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाचा पाणीपुरवठा पालिकेने १५ दिवसांपासून बंद केला आहे.

लातूर : मराठवाड्यात पाणी संकट गहिरे झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाचा पाणीपुरवठा पालिकेने १५ दिवसांपासून बंद केला आहे. त्यातच आता मंगळवारी पाण्याअभावी एकही शस्त्रक्रिया होणार नाही. रुग्णालयाने काटकसर करून सोमवारपर्यंत पाणी कसेबसे वापरले. मात्र रुग्णालयात पाणी नसल्याने नियमित शस्त्रक्रिया बंद ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११ साठवण विहिरी आहेत़ त्यात ४ लाख ९७ हजार लीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे़ पाण्याचा काटकसरीने वापर करून ते आठ-दहा दिवस पुरविले जाते़ परंतु २१ जानेवारीपासून पाणीपुरवठा झालेला नाही़ त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा साठा संपला. येथील रुग्णालयात जिल्ह्यातून तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटकातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. दररोज हजार रुग्णांची तपासणी येथे होते. सुमारे शंभर रुग्ण रोज अ‍ॅडमिट होतात़ रुग्णालयातील १७ शस्त्रक्रियागृहात रोज ५० ते ६० छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होतात़ पाणीच नसल्याने मंगळवारी या रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया होणार नाही. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जातील, असे प्रशासनाने सांगितले. महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांची भेट घेतली.