शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

औंधमधील कचरा प्रकल्प बंद करा

By admin | Updated: July 13, 2017 01:06 IST

दगडांचा ढीग ओतत जोरदार आंदोलन करूनही कचरा प्रकल्प प्लॅन्टचा प्रश्न न सुटल्याने आज अखेर नागरिकांनी थेट वर्षा बंगला गाठला

लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : सूस रोडवरील नोबेल एक्सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रकल्प प्लॅन्ट विरोधात नागरिकांनी २५० पेक्षा अधिक तक्रारी प्रशासनाकडे करूनही, प्लॅन्टच्या गेटला टाळे ठोकून गेटसमोरील आवारात दगडांचा ढीग ओतत जोरदार आंदोलन करूनही कचरा प्रकल्प प्लॅन्टचा प्रश्न न सुटल्याने आज अखेर नागरिकांनी थेट वर्षा बंगला गाठला आणि हा प्लॅन्ट तातडीने बंद करा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी लक्ष घालण्याचे आदेश दिले व पुढील आठवड्यात या कचरा प्रकल्पाला भेट देणार असल्याचे जाहीर केले. आयुक्त कुणाल कुमार यांना वारंवार फोन करूनही त्यांना नागरिकांचे फोन घेण्यास वेळ नाही मात्र प्रकल्प चालकांना भेटण्यास त्यांना वेळ आहे. महापालिका प्रशासन नागरिकांना सहकार्य करण्याऐवजी प्रकल्प चालकांना मदत करत असल्याचा थेट आरोप यावेळी नागरिकांनी केला. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे तक्रार दाखल केली असून बोर्डाने प्रकल्प चालकांच्या विरोधात २० जुलै २०१७ च्या आत कडक व तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र कारवाई करण्याचे सोडून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप हे चुकीचे वक्तव्ये करून प्रकल्प चालकांच्या बाजूने भूमिका बजावत असल्याचे यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.आमदार मेधा कुलकर्णी या प्रश्नी सातत्याने नागरिकांच्या बाजूने लढा देत असून जिथे हे मुजोर अधिकारी त्यांनाही दाद देत नाही तिथे आम्ही काय करणार ? अशी व्यथा यावेळी नागरिकांनी मांडली.