शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

विद्यार्थ्यांनी गिरवले स्वच्छतेचे धडे

By admin | Updated: July 21, 2016 02:33 IST

मुलांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर उद्याचा देश सुदृढ घडेल. शाळकरी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ शकते.

मुंबई : मुलांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर उद्याचा देश सुदृढ घडेल. शाळकरी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ शकते. यासाठीच मुंबईतील समर्पण या स्वयंसेवी संस्थेने ‘शाळा स्वास्थ्य कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी येथील श्री छेडी सिंह आश्रमशाळेतील १६६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या आश्रमशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार अदकर, रेडिओलॉजिस्ट डॉ. तनय शाह आणि डॉ. कौस्तुभ गिरी हे तीन डॉक्टर आरोग्य शिबिरासाठी गेले होते. यावेळी त्यांनी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांची तपासणी केली. या तपासणी शिबिरात पावसाळ््यातील साथीच्या आजाराबरोबरच मुलांमध्ये रक्तघटकांची कमतरता आणि त्वचेचे आजार आढळून आले. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना औषध देण्यात आले आहे. एक महिनाभर नियमित औषध घेतल्यावर पुन्हा विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत औषधांचा फायदा किती झाला हे तपासण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे समर्पण संस्थेचे विश्वस्त डॉ. रुमा भार्गव यांनी सांगितले. जेवणाआधी आणि शौचाला जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुतल्यास संसर्ग टाळणे शक्य आहे. शारीरिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याविषयी डॉ.भार्गव यांनी माहिती दिली. पालेभाज्यांचे महत्त्व समजवून सांगितले. साबणांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन धीरेन दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. (प्रतिनिधी)