शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी गिरवले स्वच्छतेचे धडे

By admin | Updated: July 21, 2016 02:33 IST

मुलांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर उद्याचा देश सुदृढ घडेल. शाळकरी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ शकते.

मुंबई : मुलांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर उद्याचा देश सुदृढ घडेल. शाळकरी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ शकते. यासाठीच मुंबईतील समर्पण या स्वयंसेवी संस्थेने ‘शाळा स्वास्थ्य कार्यक्रम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी येथील श्री छेडी सिंह आश्रमशाळेतील १६६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या आश्रमशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार अदकर, रेडिओलॉजिस्ट डॉ. तनय शाह आणि डॉ. कौस्तुभ गिरी हे तीन डॉक्टर आरोग्य शिबिरासाठी गेले होते. यावेळी त्यांनी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांची तपासणी केली. या तपासणी शिबिरात पावसाळ््यातील साथीच्या आजाराबरोबरच मुलांमध्ये रक्तघटकांची कमतरता आणि त्वचेचे आजार आढळून आले. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना औषध देण्यात आले आहे. एक महिनाभर नियमित औषध घेतल्यावर पुन्हा विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत औषधांचा फायदा किती झाला हे तपासण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे समर्पण संस्थेचे विश्वस्त डॉ. रुमा भार्गव यांनी सांगितले. जेवणाआधी आणि शौचाला जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुतल्यास संसर्ग टाळणे शक्य आहे. शारीरिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याविषयी डॉ.भार्गव यांनी माहिती दिली. पालेभाज्यांचे महत्त्व समजवून सांगितले. साबणांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन धीरेन दलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. (प्रतिनिधी)