शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्वच्छतेचे बीज मनात रुजावे!

By admin | Updated: October 2, 2016 01:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात केली. स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना, महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात केली. स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना, महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर, या स्वच्छ भारत अभियानास देशव्यापी चळवळीचे रूप देण्यात आले. याच ‘स्वच्छ भारत अभियाना‘ला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. गांधी जयंतीनिमित्त आज देशभर स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून या अभियानाविषयी आणि स्वच्छतेविषयी मते घेतली. या वेळी मान्यवरांनी या अभियानाला पाठिंबा देत विविध पातळ््यांवर, संस्थांमध्ये आणि चिमुरड्यांच्या मनात स्वच्छतेचे बीज रोवले पाहिजे, असे विचार ‘लोकमत’शी बोलताना मांडले. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया...शाळेतच व्हावे स्वच्छतेचे संस्कारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ स्वागतार्ह आहे. या अभियानाविषयी मेट्रो सिटींप्रमाणे ग्रामीण भागांतही जनजागृती झाली पाहिजे. देशाचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांना स्वच्छता अभियानात सहभागी करून घेतले पाहिजे. लहानग्यांना शालेय दिनक्रमात स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, त्याचे मूल्यमापन करणे अशा गोष्टी केल्या पाहिजे. प्रत्येक शाळेने ‘बालस्वच्छतादूत’ ही संकल्पना राबविली पाहिजे.- डॉ. विजया वाड, ज्येष्ठ साहित्यिकलोककलांतून व्हावा स्वच्छतेचा जागर‘स्वच्छ भारत अभियाना’साठी राज्यातील लोककलांच्या वैभवाचा वापर केला पाहिजे. ग्रामीण पातळीवर कानाकोपऱ्यांत भजन, भारुड, कीर्तन, गवळण अशा असंख्य प्रकारांतून स्वच्छतेची मूल्ये रुजतील.- डॉ. गणेश चंदनशिवे, लोककला अभ्यासकअस्वच्छता म्हणजे मानसिक हिंसाच!अनेक जण वस्तू, कागद अशा वस्तू इथे-तिथे टाकतात. सर्वत्र अस्वच्छता पसरवतात. ही अस्वच्छता मला मानसिक हिंसा वाटते. मनाचा अवकाश स्वच्छ राहिल्यास अनेक गोष्टींमध्ये स्वच्छता येऊ शकते. - डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ शारीरिक स्वच्छतेलामहत्त्व द्या!शारीरिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. रोज आंघोळ केली पाहिजे. त्यामुळे त्वचेचे रोग सहज दूर ठेवता येतात. दातांची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. जेवण हे नेहमी स्वच्छ पाण्यात केले पाहिजे. पान,तंबाखू आणि गुटखासारख्या गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. नैसर्गिक विधी हे स्वच्छतागृहांमध्येच केले पाहिजेत. - डॉ. जलील परकार, श्वसनविकार तज्ज्ञ स्वच्छता राखा साथीचे आजार टाळा!अस्वच्छतेमुळेही साथीच्या आजारांना खतपाणी घातले जाते. यावर मात करण्यासाठी स्वच्छतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. या स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता व्हायला हवी. या स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. - डॉ. अविनाश सुपे, संचालक, महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये स्वच्छतेचा फायदा आपल्यालाच आपण आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला, तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल. स्वच्छता राखल्यास घाणीचे साम्राज्य नष्ट होईल. वातावरण चांगले राहील व रोगराई पसरणार नाही. ही देशाची मोहीम आहे. सर्वांचा हातभार गरजेचा आहे. - अनुप कुमार, कर्णधार भारतीय कबड्डी संघ