शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

स्वच्छतेचा संदेश सत्यात आला

By admin | Updated: December 14, 2015 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मुंबईत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले मंडई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, सिनेनिर्माते सुभाष घई, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, उपायुक्त प्रकाश पाटील, साहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चोरे, साहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे, प्रमुख अभियंता अन्सारी उपस्थित होते.यावेळेस बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, की प्रत्येक माणसाच्या अंत:करणात ही स्वच्छता असली पाहिजे; तरच तो बाहेरची स्वच्छता चांगल्याप्रकारे करू शकतो. स्मार्ट सिटीसाठीसुद्धा सर्व प्रकारच्या कार्यासोबत स्वच्छता तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनेसुद्धा स्वच्छतेची शिस्त अंगी बाळगून कचरा संकलन केंद्राशिवाय इतरत्र कचरा टाकणार नाही, अशी शपथ घ्यावी. (प्रतिनिधी)स्वच्छतेत सहभाग...डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि मुंबई पालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सहभाग घेऊन स्वच्छताही केली. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस समाधान व्यक्त केले.लोकसहभागातूनच देश स्वच्छ होईलराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा जास्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी झालेल्या शुभारंभाचा कार्यक्रम हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून, खऱ्या अर्थाने स्वच्छता ही आपणच करणार आहोत. स्वच्छता मोहिमेला मिळालेला लोकसहभाग हा मोठा असून लोकसहभागातून देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस केले.