शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा संदेश सत्यात आला

By admin | Updated: December 14, 2015 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मुंबईत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले मंडई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, सिनेनिर्माते सुभाष घई, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, उपायुक्त प्रकाश पाटील, साहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चोरे, साहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे, प्रमुख अभियंता अन्सारी उपस्थित होते.यावेळेस बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, की प्रत्येक माणसाच्या अंत:करणात ही स्वच्छता असली पाहिजे; तरच तो बाहेरची स्वच्छता चांगल्याप्रकारे करू शकतो. स्मार्ट सिटीसाठीसुद्धा सर्व प्रकारच्या कार्यासोबत स्वच्छता तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनेसुद्धा स्वच्छतेची शिस्त अंगी बाळगून कचरा संकलन केंद्राशिवाय इतरत्र कचरा टाकणार नाही, अशी शपथ घ्यावी. (प्रतिनिधी)स्वच्छतेत सहभाग...डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि मुंबई पालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सहभाग घेऊन स्वच्छताही केली. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस समाधान व्यक्त केले.लोकसहभागातूनच देश स्वच्छ होईलराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा जास्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी झालेल्या शुभारंभाचा कार्यक्रम हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून, खऱ्या अर्थाने स्वच्छता ही आपणच करणार आहोत. स्वच्छता मोहिमेला मिळालेला लोकसहभाग हा मोठा असून लोकसहभागातून देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस केले.