शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

स्वच्छतेचा संदेश सत्यात आला

By admin | Updated: December 14, 2015 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे, तो खऱ्या अर्थाने सत्यात आणण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मुंबईत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले मंडई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, सिनेनिर्माते सुभाष घई, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, उपायुक्त प्रकाश पाटील, साहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चोरे, साहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे, प्रमुख अभियंता अन्सारी उपस्थित होते.यावेळेस बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, की प्रत्येक माणसाच्या अंत:करणात ही स्वच्छता असली पाहिजे; तरच तो बाहेरची स्वच्छता चांगल्याप्रकारे करू शकतो. स्मार्ट सिटीसाठीसुद्धा सर्व प्रकारच्या कार्यासोबत स्वच्छता तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनेसुद्धा स्वच्छतेची शिस्त अंगी बाळगून कचरा संकलन केंद्राशिवाय इतरत्र कचरा टाकणार नाही, अशी शपथ घ्यावी. (प्रतिनिधी)स्वच्छतेत सहभाग...डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि मुंबई पालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सहभाग घेऊन स्वच्छताही केली. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस समाधान व्यक्त केले.लोकसहभागातूनच देश स्वच्छ होईलराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा जास्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी झालेल्या शुभारंभाचा कार्यक्रम हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून, खऱ्या अर्थाने स्वच्छता ही आपणच करणार आहोत. स्वच्छता मोहिमेला मिळालेला लोकसहभाग हा मोठा असून लोकसहभागातून देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस केले.