शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयात स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

By admin | Updated: May 19, 2016 03:04 IST

स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे

अलिबाग : स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात आपल्याच जिल्हा परिषदेपासून करण्यासाठी बुधवारी स्वच्छतेची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली. रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात याबाबतचा कार्यक्रम पार पडला. साळुंखे यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले.केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीमध्ये सर्व सरकारी इमारत, कार्यालये स्वच्छ करण्यात येणार आहेत. २३ मे रोजी सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिकपणे स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे. २५ मेला अधिकारी आणि कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करायचा आहे, तर २६ मे रोजी सरकारी कार्यालयातील कागदपत्रांची नोंदणी करून ते व्यवस्थित ठेवून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावायची आहे. त्याचप्रमाणे २७ मेला सरकारी इमारत व इमारतीच्या परिसराची स्वच्छता करायची आहे. ३० मे रोजी सर्व कार्यालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच पाण्याची बचत करून अन्य लोकांनाही बचतीचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन साळुंखे यांनी केले.कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध उपाय सुचविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व स्वच्छता मिशनचे संवादतज्ज्ञ सुरेश पाटील यांनी केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी ए.के.जाधव, नंदकुमार गायकर, रविकिरण गायकवाड, नेहा जाधव यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.