शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सरकारी कार्यालयात स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

By admin | Updated: May 19, 2016 03:04 IST

स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे

अलिबाग : स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात आपल्याच जिल्हा परिषदेपासून करण्यासाठी बुधवारी स्वच्छतेची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली. रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात याबाबतचा कार्यक्रम पार पडला. साळुंखे यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले.केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीमध्ये सर्व सरकारी इमारत, कार्यालये स्वच्छ करण्यात येणार आहेत. २३ मे रोजी सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिकपणे स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे. २५ मेला अधिकारी आणि कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करायचा आहे, तर २६ मे रोजी सरकारी कार्यालयातील कागदपत्रांची नोंदणी करून ते व्यवस्थित ठेवून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावायची आहे. त्याचप्रमाणे २७ मेला सरकारी इमारत व इमारतीच्या परिसराची स्वच्छता करायची आहे. ३० मे रोजी सर्व कार्यालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच पाण्याची बचत करून अन्य लोकांनाही बचतीचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन साळुंखे यांनी केले.कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध उपाय सुचविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व स्वच्छता मिशनचे संवादतज्ज्ञ सुरेश पाटील यांनी केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी ए.के.जाधव, नंदकुमार गायकर, रविकिरण गायकवाड, नेहा जाधव यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.