शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

सुलेखनातून रेखाटला स्वच्छ भारत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2015 03:17 IST

गंगा नदीच्या घाटावर १०० फूट लांबीचा पेपर रोल अंथरला होता. एका बाजूने ‘हर हर गंगे’च्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव, तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई

बनारस : गंगा नदीच्या घाटावर १०० फूट लांबीचा पेपर रोल अंथरला होता. एका बाजूने ‘हर हर गंगे’च्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव, तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा श्लोक म्हणत अक्षरलेखन करत होते. सूर्योदयाच्या साक्षीने जमलेले भाविक घाटावर रंगलेली अक्षर दंगल स्तीमित होऊन पाहत होते. बनारस विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘कलाक्षर’ या कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी संमेलनाचा रसिकांनी मनसोक्त आनंद घेतला. पालव-देसाई जोडीच्या अक्षरलेखन आणि टायपोग्राफीचा अनोखा सामना १०० फूट लांबीच्या कागदावर रंगला. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, शिक्षीत भारत’ असा संदेश त्यातून देण्यात आला. हे सारे चालू असताना सभोवताली जमलेले भाविक सूर्याचे मंत्र आणि आरती चढ्या आवाजात म्हणत होते. सूर्य जसजसा वर येऊ लागला, तसतशी अक्षरेदेखील खुलून दिसू लागली. या अनोख्या मैफिलीनंतर अच्युत पालव यांचा ‘बनारस सुबह’ या संस्थेतर्फे मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला.कॉम्प्युटरच्या जगात अक्षरलेखनाकडे जगाचा ओढा निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे. पॅरिस येथेदेखील एका नामवंत कंपनीने इंटिरियर करण्यासाठी जगातल्या सात लिपींची निवड केली आहे, ज्यात आपल्या देवनागरीचा समावेश आहे आणि त्यासाठीदेखील आपण केलेल्या कामाची निवड होणे हा अक्षरलेखनाचा सन्मान आहे.- अच्युत पालव, सुलेखनकार