शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

2 ऑक्टोबरपर्यंत 100 शहरे स्वच्छ करणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 17:34 IST

राज्यातील लहान शहराच्या सर्वांगिण विकासासोबत पिण्याचे पाणी, घणकचरा व्यवस्थापन व निर्मल करण्याला प्राधान्य देण्यात आले

ऑनलाइन लोकमत

नागपूर दि. 22 : राज्यातील लहान शहराच्या सर्वांगिण विकासासोबत पिण्याचे पाणी, घणकचरा व्यवस्थापन व निर्मल करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील 300 शहरांपैकी पहिल्यांदाच 50 शहरे निर्मल झाले असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत 100 शहरे निर्मल व घणकचरा मुक्त शहरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.वाडी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजना टप्पा तीनचे भूमीपूजन तसेच 40 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री समीर मेघे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, गिरीष व्यास तसेच नगराध्यक्ष प्रतिक्षा पाटील, उपाध्यक्ष नरेश चरडे, वाडी नगर परिषदेचे सर्वपदाधिकारी नगरसेवक व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाडी शहराला कायम पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल विकास कार्यक्रमाअंतर्गत टप्पा 1 व 2 ची कामे पूर्ण करण्यात आली असून टप्पा 3 साठी 13 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाडी शहराचा कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गोरेवाडा येथून पाणी पुरवठा करण्याचा योजना प्रस्तावित असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहरालगत असूनही वाडीचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नाही. या शहराचा विस्तार वाढला असला तरी नागरिकांना सोयी सुविधा पुरवू शकलो नाही. त्यामुळेच वाडीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भुयारी गटार योजनेसह येत्या एक वर्षात लोकसहभागातून स्वच्छ व निर्मल करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.वाडी या गावाच्या लोकप्रतिनिधी म्हणून यापूर्वी कार्यरत असताना विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असून जिल्ह्यातील नगर परिषदांच्या विकासासाठी 350 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापैकी 40 कोटी रुपये वाडी शहरासाठी असून यापुढेही अधिक निधी देण्याचा तसेच आंबेडकर नगरवासियांना मालकी हक्क पट्टे देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाडी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडवितानाच घणकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना करताना शहरातून वाहत जाणाऱ्या गटारातील पाण्याचा पुर्नवापर करण्या संदर्भात प्राधान्याने निर्णय घ्यावा. वाडी शहर हे आदर्श शहर म्हणून विकसित करण्यासाठी येत्या 25 वर्षाचे विकासाचे रिजन तयार करावे व त्यानुसार नियोजनबद्ध विकास करावा.हिंगणा येथून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यांसाठी 1 हजार 200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा शहरातील तसेच वाडीतील वाहतुकीमुळे होणारी कोंडी तसेच अपघाताचे प्रमाणही कमी होतील. बाह्यवळण रस्त्यांवर लॉजेस्टिक पार्क तयार करुन शहरातील व वाडी येथील सर्व गोडाऊन तेथे स्थलांतरीत करावे, अशी सूचना करताना मेट्रो रेल्वे हिंगणा, वाडी व अमरावती रोड मार्गे धावण्या संदर्भातही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर शहर व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे हे शहर देशातील उत्कृष्ट शहर म्हणून ओळखले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याची स्वतंत्र मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना तयार केली असून यासाठी अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारमुळे भूगर्भात पाणी साठवण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम प्रथमच राबविण्यात येत असून राज्यातील पिण्यासाठी व शाश्वत सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वच्छ वाडी सुंदर वाडी करण्याला प्राधान्य देण्यात आले असून वाडीच्या विकास कामासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण निधी देण्यात येईल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पेरी अर्बन योजनेतून गोरेवाडामधून वाडीला पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी आमदार समीर मेघे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर केलेल्या प्रास्ताविकात वाडीचा पिण्याचा पाण्यासाठी महत्वकांक्षी असलेल्या योजना येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल. वाडी येथे ट्रान्सपोर्ट प्लाझा तसेच आंबेडकर नगर येथील नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे अशी मागणी केली.कार्यक्रमाचे संचालन गटनेते प्रेम झाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा पाटील यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष नरेश चरडे, बांधकाम समिती सभापती हर्षल काकडे, वाडी शहर अध्यक्ष केशव गोंधळे, राजेश जयस्वाल, नरेंद्र लेंडे, मुख्याधिकारी राजेश भगत, नगरसेविका निता पुणावार, राकेश मिश्रा, केशव बांधरे, अस्मिता मेश्राम, सभापती कैलास ममतापुरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.