शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

2 ऑक्टोबरपर्यंत 100 शहरे स्वच्छ करणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 17:34 IST

राज्यातील लहान शहराच्या सर्वांगिण विकासासोबत पिण्याचे पाणी, घणकचरा व्यवस्थापन व निर्मल करण्याला प्राधान्य देण्यात आले

ऑनलाइन लोकमत

नागपूर दि. 22 : राज्यातील लहान शहराच्या सर्वांगिण विकासासोबत पिण्याचे पाणी, घणकचरा व्यवस्थापन व निर्मल करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील 300 शहरांपैकी पहिल्यांदाच 50 शहरे निर्मल झाले असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत 100 शहरे निर्मल व घणकचरा मुक्त शहरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.वाडी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजना टप्पा तीनचे भूमीपूजन तसेच 40 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री समीर मेघे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, गिरीष व्यास तसेच नगराध्यक्ष प्रतिक्षा पाटील, उपाध्यक्ष नरेश चरडे, वाडी नगर परिषदेचे सर्वपदाधिकारी नगरसेवक व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाडी शहराला कायम पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल विकास कार्यक्रमाअंतर्गत टप्पा 1 व 2 ची कामे पूर्ण करण्यात आली असून टप्पा 3 साठी 13 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाडी शहराचा कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गोरेवाडा येथून पाणी पुरवठा करण्याचा योजना प्रस्तावित असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहरालगत असूनही वाडीचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नाही. या शहराचा विस्तार वाढला असला तरी नागरिकांना सोयी सुविधा पुरवू शकलो नाही. त्यामुळेच वाडीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भुयारी गटार योजनेसह येत्या एक वर्षात लोकसहभागातून स्वच्छ व निर्मल करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.वाडी या गावाच्या लोकप्रतिनिधी म्हणून यापूर्वी कार्यरत असताना विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असून जिल्ह्यातील नगर परिषदांच्या विकासासाठी 350 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापैकी 40 कोटी रुपये वाडी शहरासाठी असून यापुढेही अधिक निधी देण्याचा तसेच आंबेडकर नगरवासियांना मालकी हक्क पट्टे देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाडी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडवितानाच घणकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना करताना शहरातून वाहत जाणाऱ्या गटारातील पाण्याचा पुर्नवापर करण्या संदर्भात प्राधान्याने निर्णय घ्यावा. वाडी शहर हे आदर्श शहर म्हणून विकसित करण्यासाठी येत्या 25 वर्षाचे विकासाचे रिजन तयार करावे व त्यानुसार नियोजनबद्ध विकास करावा.हिंगणा येथून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यांसाठी 1 हजार 200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा शहरातील तसेच वाडीतील वाहतुकीमुळे होणारी कोंडी तसेच अपघाताचे प्रमाणही कमी होतील. बाह्यवळण रस्त्यांवर लॉजेस्टिक पार्क तयार करुन शहरातील व वाडी येथील सर्व गोडाऊन तेथे स्थलांतरीत करावे, अशी सूचना करताना मेट्रो रेल्वे हिंगणा, वाडी व अमरावती रोड मार्गे धावण्या संदर्भातही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर शहर व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे हे शहर देशातील उत्कृष्ट शहर म्हणून ओळखले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याची स्वतंत्र मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना तयार केली असून यासाठी अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारमुळे भूगर्भात पाणी साठवण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम प्रथमच राबविण्यात येत असून राज्यातील पिण्यासाठी व शाश्वत सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वच्छ वाडी सुंदर वाडी करण्याला प्राधान्य देण्यात आले असून वाडीच्या विकास कामासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण निधी देण्यात येईल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पेरी अर्बन योजनेतून गोरेवाडामधून वाडीला पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी आमदार समीर मेघे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर केलेल्या प्रास्ताविकात वाडीचा पिण्याचा पाण्यासाठी महत्वकांक्षी असलेल्या योजना येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल. वाडी येथे ट्रान्सपोर्ट प्लाझा तसेच आंबेडकर नगर येथील नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे अशी मागणी केली.कार्यक्रमाचे संचालन गटनेते प्रेम झाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा पाटील यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष नरेश चरडे, बांधकाम समिती सभापती हर्षल काकडे, वाडी शहर अध्यक्ष केशव गोंधळे, राजेश जयस्वाल, नरेंद्र लेंडे, मुख्याधिकारी राजेश भगत, नगरसेविका निता पुणावार, राकेश मिश्रा, केशव बांधरे, अस्मिता मेश्राम, सभापती कैलास ममतापुरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.