शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करणार

By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST

हसन मुश्रीफ यांची माहिती : ६ जूनला पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते, पण त्यांनी ‘शब्द’ पाळलेला नाही. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा साखरेचे दर कोसळल्याने कारखानदार अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने ३१ रुपये प्रतिकिलो साखरेचा बाजारातील भाव गृहीत धरून एफआरपी काढली आहे. पण सध्या साखरेचे दर २१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कारखाने यंदा ३० ते ४० कोटींनी तोट्यात आहेत. आगामी हंगामासाठी कोणतीही बँक त्यांना कर्ज देणार नाही. जिल्ह्णातील कारखान्यांनी केवळ एफआरपीप्रमाणे पैसे दिले आहेत, उर्वरित ठिकाणी १५०० ते १९०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यामुळे हे कारखाने फारसे अडचणीत नाहीत पण जिल्ह्णातील कारखाने व शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत कारखान्यांना दोन हजार कोटी पॅकेजची घोषणा केली होती पण ही घोषणा हवेतच विरली आहे. याविरोधात आगामी अधिवेशनात दोघांवर हक्कभंग दाखल करून विधानसभा बंद पाडू, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. ३१ मेपूर्वी दोन हजार कोटींचे पॅकेज कारखान्यांना दिले नाही तर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. ६ जूनला पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी शनिवारी (दि. ३०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दुपारी ४ वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)विनय कोरे यांच्याशी आज चर्चा बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी -जनसुराज्य पक्षाची आघाडी आहे. याही निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. ३०) रात्री आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथे माजी मंत्री विनय कोरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.