शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळला

By admin | Updated: March 2, 2017 02:08 IST

मुंबई पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता आणि हा वाद शांत होत असतानाच आता पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. पालिकेतील खराब निकालांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना कार्यकारिणीची बैठक घेण्याची विनंती केली आहे. बंद दरवाजामागे किंवा मोकळ्या मैदानात काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचेही पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत वाद निर्माण झाले. अनेक वादविवादांनंतर निवडणूक जवळ येताच काँग्रेस नेत्यांकडून एकत्रित येत प्रचारही करण्यात आला. त्यानंतर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ३१ उमेदवारही निवडून आले. परंतु त्यानंतर संजय निरुपम यांनी आरोपांच्या फैरी झाडत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. परंतु हा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. (प्रतिनिधी)सर्व वादविवादानंतर पालिका निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या प्रचार पद्धतीवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी तसेच सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि खराब निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे व काँग्रेस नेतृत्वाकडे सपशेल खोटे सांगण्याऐवजी त्यांची जबाबदारी निश्चित करावी यासाठी कामत यांनी कार्यकारिणीची बैठक घेण्याची विनंती केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांसमोरच सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यास कार्यकर्ते गोंधळून जाण्याऐवजी सत्य परिस्थितीची जाण त्यांना होईल, असे पत्रातून सांगण्यात आले आहे.