शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

भीमसेन जोशींच्या मालमत्तेचा वाद

By admin | Updated: October 25, 2015 01:51 IST

थोर दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या सावत्र मुलांमध्ये मालमत्तेवरून सुरू असलेला वाद एक कोटी रुपयांहून कमी मूल्याचा असल्याने सुधारित

-  जिल्हा न्यायालयात वर्ग

मुंबई: थोर दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या सावत्र मुलांमध्ये मालमत्तेवरून सुरू असलेला वाद एक कोटी रुपयांहून कमी मूल्याचा असल्याने सुधारित कायद्यानुसार तो यापुढे पुणे जिल्हा न्यायालयात चालेल, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.वडिलांच्या मालमत्तेत आपल्याला १/७ हिस्सा मिळावा यासाठी भीमसेन जोशी यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या राघवेंद्र या मुलाने त्याच्या सावत्र भावंडांविरुद्ध पुण्याच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यात दिवाणी वरिष्ठ स्तर दिवाणी जयंत व इतर सावत्र भावंडांविरुद्ध हंगामी मनाई आदेश जारी केला. त्याविरुद्ध जयंत व इतर प्रतिवादींनी केलेले अपील उच्च न्यायालयात प्रलंबित होते.दरम्यान, महाराष्ट्र सरकारने दिवाणी न्यायायले कायद्यात दुरुस्ती करून यंदाच्या १५ सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयांना एक कोटी रुपयांपर्यंतची अपिले चालविण्याची वाढीव अधिकारकक्षा बहाल केली. त्यानुसार जयंत व इतरांचे अपील जिल्हा न्यायालयात वर्ग करावे, अशी तोंडी विनंती राघवेंद्र यांनी केली. न्या. मृदुला भाटकर यांनी कायद्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंंचे म्हणणे ऐकून घेऊन सुधारित कायद्यानुसार उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले अपील पुणे जिल्हा न्यायालयात वर्ग झाले असल्याचा निकाल दिला.मात्र, या मुद्द्यावर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ द्यावा, ही जयंत व इतर अपिलकर्त्यांनी केलेली विनंती मान्य करून न्या. भाटकर यांनी आपला निकाल चार आठवड्यांसाठी तहकूब ठेवला.राघवेंद्र यांनी त्यांच्या दाव्यात दिवंगत भीमसेन जोशी यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन ३.४० कोटी रुपये केले आहे. त्यामुळे सुधारित कायद्यानुसार आमचे अपील जिल्हा न्यायालयात नव्हे, तर उच्च न्यायालयातच चालायला हवे, असे जयंत व इतरांचे म्हणणे होते, परंतु राघवेंद्र यांच्या दाव्याचे बारकाईने विश्लेषण केले तर त्यांचा दावा या संपूर्ण मालमत्तेसाठी नव्हे, तर त्याच्या १/७ हिश्श्यासाठी आहे. आपल्या या हिश्श्याचे मूल्यांकन त्यांनी ४७ लाख रुपये केले आहे. ही रक्कम एक कोटी रुपयांहून कमी असल्याने दिवाणी न्यायालयाच्या मनाई हुकमाविरुद्धचे अपील नव्या कायद्यानुसार जिल्हा न्यायाधीशाकडे वर्ग झाले आहे.(विशेष प्रतिनिधी)मृत्युपत्राला आव्हानभीमसेन जोशी यांनी २२ सप्टेंबर २००९ रोजी केलेले मृत्युपत्र व पुणे शहरांतील दोन फ्लॅट्सच्या संदर्भात केलेली दानपत्रे व विक्रीपत्रे यांच्या वैधतेस राघवेंद्र यांनी आव्हान दिले आहे. या सर्व मालमत्तांमध्ये आपल्याला ४७ लाख रुपयांचा हिस्सा मिळावा, अशी त्यांची विनंती आहे.राघवेंद्र यांची विनंती : महाराष्ट्र सरकारने यंदाच्या १५ सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयांना एक कोटी रुपयांपर्यंतची अपिले चालविण्याची वाढीव अधिकारकक्षा बहाल केली. त्यानुसार जयंत व इतरांचे अपील जिल्हा न्यायालयात वर्ग करावे, अशी तोंडी विनंती राघवेंद्र यांनी केली.