शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

भीमसेन जोशींच्या मालमत्तेचा वाद

By admin | Updated: October 25, 2015 01:51 IST

थोर दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या सावत्र मुलांमध्ये मालमत्तेवरून सुरू असलेला वाद एक कोटी रुपयांहून कमी मूल्याचा असल्याने सुधारित

-  जिल्हा न्यायालयात वर्ग

मुंबई: थोर दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या सावत्र मुलांमध्ये मालमत्तेवरून सुरू असलेला वाद एक कोटी रुपयांहून कमी मूल्याचा असल्याने सुधारित कायद्यानुसार तो यापुढे पुणे जिल्हा न्यायालयात चालेल, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.वडिलांच्या मालमत्तेत आपल्याला १/७ हिस्सा मिळावा यासाठी भीमसेन जोशी यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या राघवेंद्र या मुलाने त्याच्या सावत्र भावंडांविरुद्ध पुण्याच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यात दिवाणी वरिष्ठ स्तर दिवाणी जयंत व इतर सावत्र भावंडांविरुद्ध हंगामी मनाई आदेश जारी केला. त्याविरुद्ध जयंत व इतर प्रतिवादींनी केलेले अपील उच्च न्यायालयात प्रलंबित होते.दरम्यान, महाराष्ट्र सरकारने दिवाणी न्यायायले कायद्यात दुरुस्ती करून यंदाच्या १५ सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयांना एक कोटी रुपयांपर्यंतची अपिले चालविण्याची वाढीव अधिकारकक्षा बहाल केली. त्यानुसार जयंत व इतरांचे अपील जिल्हा न्यायालयात वर्ग करावे, अशी तोंडी विनंती राघवेंद्र यांनी केली. न्या. मृदुला भाटकर यांनी कायद्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंंचे म्हणणे ऐकून घेऊन सुधारित कायद्यानुसार उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले अपील पुणे जिल्हा न्यायालयात वर्ग झाले असल्याचा निकाल दिला.मात्र, या मुद्द्यावर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ द्यावा, ही जयंत व इतर अपिलकर्त्यांनी केलेली विनंती मान्य करून न्या. भाटकर यांनी आपला निकाल चार आठवड्यांसाठी तहकूब ठेवला.राघवेंद्र यांनी त्यांच्या दाव्यात दिवंगत भीमसेन जोशी यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन ३.४० कोटी रुपये केले आहे. त्यामुळे सुधारित कायद्यानुसार आमचे अपील जिल्हा न्यायालयात नव्हे, तर उच्च न्यायालयातच चालायला हवे, असे जयंत व इतरांचे म्हणणे होते, परंतु राघवेंद्र यांच्या दाव्याचे बारकाईने विश्लेषण केले तर त्यांचा दावा या संपूर्ण मालमत्तेसाठी नव्हे, तर त्याच्या १/७ हिश्श्यासाठी आहे. आपल्या या हिश्श्याचे मूल्यांकन त्यांनी ४७ लाख रुपये केले आहे. ही रक्कम एक कोटी रुपयांहून कमी असल्याने दिवाणी न्यायालयाच्या मनाई हुकमाविरुद्धचे अपील नव्या कायद्यानुसार जिल्हा न्यायाधीशाकडे वर्ग झाले आहे.(विशेष प्रतिनिधी)मृत्युपत्राला आव्हानभीमसेन जोशी यांनी २२ सप्टेंबर २००९ रोजी केलेले मृत्युपत्र व पुणे शहरांतील दोन फ्लॅट्सच्या संदर्भात केलेली दानपत्रे व विक्रीपत्रे यांच्या वैधतेस राघवेंद्र यांनी आव्हान दिले आहे. या सर्व मालमत्तांमध्ये आपल्याला ४७ लाख रुपयांचा हिस्सा मिळावा, अशी त्यांची विनंती आहे.राघवेंद्र यांची विनंती : महाराष्ट्र सरकारने यंदाच्या १५ सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयांना एक कोटी रुपयांपर्यंतची अपिले चालविण्याची वाढीव अधिकारकक्षा बहाल केली. त्यानुसार जयंत व इतरांचे अपील जिल्हा न्यायालयात वर्ग करावे, अशी तोंडी विनंती राघवेंद्र यांनी केली.