शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना मिळणार सेवा अधिकार

By admin | Updated: November 1, 2014 02:11 IST

सेवा अधिकार कायदा (राइट टू सव्र्हिस ) आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय : शासकीय कार्यालयांमध्ये खोळंबा होणार नाही
मुंबई :  राज्यातील कुठल्याही नागरिकाचे शासकीय कार्यालयामधील काम विशिष्ट वेळेत झाले पाहिजे, यासाठी सेवा अधिकार कायदा (राइट टू सव्र्हिस ) आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. 
फडणवीस यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, या कायद्यामुळे नागरिकांच्या कामांचा शासकीय कार्यालयांमध्ये  खोळंबा होणार नाही. एखादी व्यक्ती सरकारी कार्यालयात कामासाठी कधी आली, त्याच्या कामाची कशी दखल घेण्यात आली, किती कालावधीत ते काम झाले, काम झाले नसेल तर त्यासाठी जबाबदार अधिकारी कोण, या बाबींचा कायद्यात समावेश असेल. जनतेला विहित कालावधीत न्याय न देणा:या अधिका:यांवर कारवाई केली जाईल. माहिती अधिकार कायद्याच्या धर्तीवर सेवा अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यतेखालील समिती या कायद्याचा मसुदा अहवाल एक महिन्याच्या आत तयार करेल आणि मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडला जाईल. 
फडणवीसांनी या वेळी राज्याला पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान सरकारची हमी दिली. राज्याचा सर्वसमावेशक विकास हाच आपल्या कामाचा फोकस असेल. प्रशासनात काम करताना चुका होऊ शकतात. पण बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी नोकरशाहीला दिला. 15 वर्षात राज्याची विस्कटलेली घडी बसायला वेळ लागेल, असे ते म्हणाले. 
राज्य टोलमुक्त केले जाईल, धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, एलबीटी रद्द केला जाईल, अशी आश्वासने प्रचारात दिली होती. ही सगळी आश्वासने निश्चितपणो पाळली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल. राज्याच्या हितासाठी जे जे करायचे आहे, ते केले जाईल आणि कुणाचाही दबाव स्वीकारला जाणार नाही, असे ते म्हणाले. 
पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा. त्यांना पेन्शन यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.  (विशेष प्रतिनिधी)
 
तर 52 हजार कोटींचे कर्ज काढावे लागेल
आघाडी सरकारने जाता जाता ज्या योजनांची घोषणा केली त्यासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे त्या कागदावर राहिल्या. आता त्यांची अंमलबजावणी करायची तर आणखी 52 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागेल. या घोषणांचा आढावा घ्यावा लागेल आणि फेरविचारही करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.
 
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह मागास भागाचा विकास हा आपला पहिला अजेंडा असेल. महाराष्ट्र नंबर एक वर आणण्यासाठी गुजरातसह सर्व राज्यांशी निकोप स्पर्धा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. 
 
समतोल साधण्याचा प्रयत्न
च्मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून समावेश करताना प्रांतिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. 
च्फडणवीस यांच्यासह मुनगंटीवार हे विदर्भातील, पंकजा मुंडे मराठवाडा, एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्र, चंद्रकांत पाटील व दिलीप कांबळे हे पश्चिम महाराष्ट्र तर विनोद तावडे, प्रकाश महेता, विष्णू सवरा आणि विद्या ठाकूर हे मुंबई-कोकण येथील प्रतिनिधित्व करतात. 
च्फडणवीस (ब्राrाण), पाटील, तावडे (मराठा), खडसे (लेवा पाटील), पंकजा मुंडे (ओबीसी), मुनगंटीवार (कोमटी), सवरा (आदिवासी), कांबळे (अनुसूचित जाती), प्रकाश महेता (गुजराती), विद्या ठाकूर (उत्तर भारतीय)