शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

आघाडीचे नगरसेवक पुन्हा स्वगृही येणार?

By admin | Updated: January 19, 2017 04:00 IST

युतीच्या दृष्टीने सकारात्मक पावित्रा घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून शिवसेना आणि भाजपात गेलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे : एकीकडे युतीची बोलणी पुढे सरकत असल्याने आणि भाजपानेदेखील युतीच्या दृष्टीने सकारात्मक पावित्रा घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून शिवसेना आणि भाजपात गेलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. भाजपामध्ये गेलेल्या काहींनी शिवसेनेबरोबर घरोबा नको असल्याचे सांगून तसे फलकही लावले होते. परंतु, तरीसुद्धा त्यांना डावलून युतीची बोलणी सुरु असल्याने त्यातील अनेकांनी पुन्हा स्वगृही येण्याची बोलणी सुरु केली आहे. याला काँग्रेस, राष्ट्रवादीने दुजोरा दिला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा या निवडणुकीतही स्वबळावर लढतील, अशी आशा इतर पक्षातील अनेकांना होती. त्यामुळेच याच मुद्याचा आधार घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपात जाऊन आपले तिकीट पक्के केले. यामध्ये कोपरी, वागळे, घोडबंदर, शहरी भागातील अनेकांचा समावेश आहे. या दोन्ही पक्षांच्या बाजूने सध्या सत्तेची वारे वाहत असल्याने आपणही सत्तेचा उपभोग घेऊ याच हेतूने या मंडळींनी हा प्रवेश केला होता. परंतु, आता युतीची बोलणी सुरु झाल्याने त्यांचे फासे त्यांच्यावरच पलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती झाली तर शिवसेनेचे दोन आणि भाजपाचे दोन असे उमेदवार निवडणुकीत येऊ शकतात. तर काही ठिकाणी शिवसेनेचे तीन आणि भाजपाचा एक असेही समीकरण होऊ शकते. त्यामुळेच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून शिवसेना-भाजपामध्ये दाखल झालेल्यांच्या मनातील धडकी वाढली आहे.एकूणच युतीचा फैसला कसा होतो, यावरच काहींनी आपले राजकीय भवितव्य ठरविण्यास सुरुवात केली आहे. काहींना तर युती पचनी पडत नसल्याने त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)>दोन्ही पक्षांचे नेते आता बसले अडूनकाहींनी तर त्यानुसार त्या पक्षांच्या नेत्यांबरोबर काहींनी चर्चा सुरु केली आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी वागळे इस्टेट भागातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला मध्यस्थी करुन काँग्रेसमध्ये पुन्हा येण्यासाठी विनंती केल्याची माहिती काँग्रेसच्याच सूत्रांनी दिली. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीतही सुरु आहे. राष्ट्रवादी सोडून गेलेले काही नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्यासाठी चर्चा करीत आहेत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र आता अडून बसले आहेत. या मंडळींचा निर्णय योग्य वेळीच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.