शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

नागरिकांचा सवाल, चिखल तुडवत ग्रामस्थांनी जावे कसे

By admin | Updated: July 24, 2016 20:31 IST

सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 24 - सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला आहे. मात्र, गावातील पर्यायी रस्त्यावर भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याने जीवघेणे वळण घेऊन गावकऱ्यांची कसरत सुरू आहे.

दोन वर्षांच्या इतिहासात रस्त्याची कासवगतीने प्रगती सुरू आहे. गावकऱ्यांचा कुठलाही विचार पूल बनवताना ठेवला नसल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा आग्रह धरून कामात खोडा निर्माण केला होता. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत बैठक घेऊन रास्त मागणीवर विचार करण्यात आला. रखडलेल्या स्लॅबचे काम अखेर सुरू झाले. गत आठवड्यापूर्वी पावसाने ग्रामस्थांची पुन्हा दळणवळणाची कोंडी निर्माण झाली होती. पुलावर लोंबकळणाऱ्या तारांना विद्युत वितरणने हटविल्याने पुलावर मुरूम, दगडाचा चुरा टाकून ग्रामस्थांना व भारत बटालियनला रस्ता सुरू करून दिला. मात्र शुक्रवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे पुन्हा दलदल होऊन वाहन चालविताना अत्यंत कसरत करावी लागत आहे.

भिंतीचे बांधकाम सुरू...

पर्यायी रस्त्यावर सिमेंट भिंत बांधण्याचे काम सुरू केले असून, तेथून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहास रोखणार कसे असा सवालही उपस्थित केला जात आहे. पर्यायी पुलाचे काम त्वरित करावे, स्कूल बसला तर अत्यंत धोकादायक अवस्थेतून जावे लागत आहे, अशी स्थानिक पालकांची ओरड आहे. नागरिकांना वेठीस धरू नका ...

गावातील नागरिकांना वेठीस धरू नका कारण आजारी नागरिकांना रुग्णालयात नेताना रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. वयोवृद्ध महिला व शाळकरी मुलांची चिंता वाढली असल्याची खंत भाजपचे जमील पटेल यांचे म्हणणे आहे.