शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागरिकांचा सवाल, चिखल तुडवत ग्रामस्थांनी जावे कसे

By admin | Updated: July 24, 2016 20:31 IST

सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 24 - सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला आहे. मात्र, गावातील पर्यायी रस्त्यावर भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याने जीवघेणे वळण घेऊन गावकऱ्यांची कसरत सुरू आहे.

दोन वर्षांच्या इतिहासात रस्त्याची कासवगतीने प्रगती सुरू आहे. गावकऱ्यांचा कुठलाही विचार पूल बनवताना ठेवला नसल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा आग्रह धरून कामात खोडा निर्माण केला होता. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत बैठक घेऊन रास्त मागणीवर विचार करण्यात आला. रखडलेल्या स्लॅबचे काम अखेर सुरू झाले. गत आठवड्यापूर्वी पावसाने ग्रामस्थांची पुन्हा दळणवळणाची कोंडी निर्माण झाली होती. पुलावर लोंबकळणाऱ्या तारांना विद्युत वितरणने हटविल्याने पुलावर मुरूम, दगडाचा चुरा टाकून ग्रामस्थांना व भारत बटालियनला रस्ता सुरू करून दिला. मात्र शुक्रवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे पुन्हा दलदल होऊन वाहन चालविताना अत्यंत कसरत करावी लागत आहे.

भिंतीचे बांधकाम सुरू...

पर्यायी रस्त्यावर सिमेंट भिंत बांधण्याचे काम सुरू केले असून, तेथून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहास रोखणार कसे असा सवालही उपस्थित केला जात आहे. पर्यायी पुलाचे काम त्वरित करावे, स्कूल बसला तर अत्यंत धोकादायक अवस्थेतून जावे लागत आहे, अशी स्थानिक पालकांची ओरड आहे. नागरिकांना वेठीस धरू नका ...

गावातील नागरिकांना वेठीस धरू नका कारण आजारी नागरिकांना रुग्णालयात नेताना रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. वयोवृद्ध महिला व शाळकरी मुलांची चिंता वाढली असल्याची खंत भाजपचे जमील पटेल यांचे म्हणणे आहे.