शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा सवाल, चिखल तुडवत ग्रामस्थांनी जावे कसे

By admin | Updated: July 24, 2016 20:31 IST

सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 24 - सातारा नदीवर पुलाचे काम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, पुलावर माती, दगडाचा कच टाकून तात्पुरता रस्ता रहदारीला मोकळा केला आहे. मात्र, गावातील पर्यायी रस्त्यावर भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याने जीवघेणे वळण घेऊन गावकऱ्यांची कसरत सुरू आहे.

दोन वर्षांच्या इतिहासात रस्त्याची कासवगतीने प्रगती सुरू आहे. गावकऱ्यांचा कुठलाही विचार पूल बनवताना ठेवला नसल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा आग्रह धरून कामात खोडा निर्माण केला होता. तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत बैठक घेऊन रास्त मागणीवर विचार करण्यात आला. रखडलेल्या स्लॅबचे काम अखेर सुरू झाले. गत आठवड्यापूर्वी पावसाने ग्रामस्थांची पुन्हा दळणवळणाची कोंडी निर्माण झाली होती. पुलावर लोंबकळणाऱ्या तारांना विद्युत वितरणने हटविल्याने पुलावर मुरूम, दगडाचा चुरा टाकून ग्रामस्थांना व भारत बटालियनला रस्ता सुरू करून दिला. मात्र शुक्रवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे पुन्हा दलदल होऊन वाहन चालविताना अत्यंत कसरत करावी लागत आहे.

भिंतीचे बांधकाम सुरू...

पर्यायी रस्त्यावर सिमेंट भिंत बांधण्याचे काम सुरू केले असून, तेथून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहास रोखणार कसे असा सवालही उपस्थित केला जात आहे. पर्यायी पुलाचे काम त्वरित करावे, स्कूल बसला तर अत्यंत धोकादायक अवस्थेतून जावे लागत आहे, अशी स्थानिक पालकांची ओरड आहे. नागरिकांना वेठीस धरू नका ...

गावातील नागरिकांना वेठीस धरू नका कारण आजारी नागरिकांना रुग्णालयात नेताना रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. वयोवृद्ध महिला व शाळकरी मुलांची चिंता वाढली असल्याची खंत भाजपचे जमील पटेल यांचे म्हणणे आहे.