शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

नागरिकांनी केलेल्या तक्रारी ही परकीय सरकारांची गुपिते!

By admin | Updated: June 6, 2016 02:56 IST

राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात

मुंबई : राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात मिळालेली माहिती असल्याने’ याच्या प्रती उपलब्ध करून देता येणार नाहीत, असे धक्कादायक उत्तर मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव सुदाम गवळी यांनी दिले आहे.ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केलेल्या ‘आरटीआय’ अर्जावर गवळी यांनी हे उत्तर दिले आहे. हे उत्तर देणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्याच्या अगाध ज्ञानापुढे हसावे की रडावे या पेचात पडलेल्या गांधी यांनी आता न मिळालेली माहिती मिळविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अपिलीय माहिती अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. गांधी यांनी हा आरटीआय अर्ज गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी केला होता. पाच महिने त्या अर्जाची सामान्य प्रशासन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय, माहिती तंत्रज्ञान संचालनालय अशी टोलवाटोलवी केल्यानंतर हे उत्तर देण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलवर किती तक्रारी प्राप्त झाल्या व त्यापैकी किती तक्रारींचे निवारण करण्यात आले, असे गांधी यांनी विचारले होते. अर्ज नोव्हेंबर २०१५मधील होता. त्यामुळे त्याआधीच्या सहा महिन्यांत एकूण ९,८८९ तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या, अशी माहिती गवळी यांनी दिली. निकाली निघालेल्या तक्रारींचा ९,४६० हा आकडा मात्र यंदाच्या ३० एप्रिलपर्यंतचा देण्यात आला. हे दोन्ही आकडे एकाच कालखंडाशी संबंधित नसल्याने त्यांची सांगड कशी घालावी, असा प्रश्न आहे.दाखल झालेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण यांच्या प्रतीही गांधी यांनी सीडीवर मागितल्या होत्या. गवळी यांनी अगाध ज्ञान पाजळत याचे असे उत्तर दिले - ‘दाखल झालेल्या तक्रारी व त्यांचे झालेले निराकरण यांच्या प्रती माहितीचा अधिकार अधिकार अधिनियम २०१५च्या कलम ८(१)(एफ)नुसार आपणास देता येत नाहीत.’ (विशेष प्रतिनिधी)