शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

नागरिकांनी केलेल्या तक्रारी ही परकीय सरकारांची गुपिते!

By admin | Updated: June 6, 2016 02:56 IST

राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात

मुंबई : राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात मिळालेली माहिती असल्याने’ याच्या प्रती उपलब्ध करून देता येणार नाहीत, असे धक्कादायक उत्तर मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव सुदाम गवळी यांनी दिले आहे.ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केलेल्या ‘आरटीआय’ अर्जावर गवळी यांनी हे उत्तर दिले आहे. हे उत्तर देणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्याच्या अगाध ज्ञानापुढे हसावे की रडावे या पेचात पडलेल्या गांधी यांनी आता न मिळालेली माहिती मिळविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अपिलीय माहिती अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. गांधी यांनी हा आरटीआय अर्ज गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी केला होता. पाच महिने त्या अर्जाची सामान्य प्रशासन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय, माहिती तंत्रज्ञान संचालनालय अशी टोलवाटोलवी केल्यानंतर हे उत्तर देण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलवर किती तक्रारी प्राप्त झाल्या व त्यापैकी किती तक्रारींचे निवारण करण्यात आले, असे गांधी यांनी विचारले होते. अर्ज नोव्हेंबर २०१५मधील होता. त्यामुळे त्याआधीच्या सहा महिन्यांत एकूण ९,८८९ तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या, अशी माहिती गवळी यांनी दिली. निकाली निघालेल्या तक्रारींचा ९,४६० हा आकडा मात्र यंदाच्या ३० एप्रिलपर्यंतचा देण्यात आला. हे दोन्ही आकडे एकाच कालखंडाशी संबंधित नसल्याने त्यांची सांगड कशी घालावी, असा प्रश्न आहे.दाखल झालेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण यांच्या प्रतीही गांधी यांनी सीडीवर मागितल्या होत्या. गवळी यांनी अगाध ज्ञान पाजळत याचे असे उत्तर दिले - ‘दाखल झालेल्या तक्रारी व त्यांचे झालेले निराकरण यांच्या प्रती माहितीचा अधिकार अधिकार अधिनियम २०१५च्या कलम ८(१)(एफ)नुसार आपणास देता येत नाहीत.’ (विशेष प्रतिनिधी)