शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांची ‘चिखलफेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 22:53 IST

हर्सूल भागातील नागरिकांना सोमवारी सकाळी चिखलात पळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा ज्येष्ठ, सर्वच चिखलाने

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.24 -  हर्सूल भागातील नागरिकांना सोमवारी सकाळी चिखलात पळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा ज्येष्ठ, सर्वच चिखलाने माखलेले. बघणा-यांना हे दृश्य मजेशीर वाटेल. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या चिखलाचे शिंतोडे अंगावर घेत चालणाºया नागरिकांच्या संतापाचा हा उद्रेक होता.
हर्सूलमध्ये बहुतांश भागांतील रस्त्यांची स्थिती न बघण्यासारखी आहे. येथील वॉर्ड क्र .२ मध्ये तर मागच्या चार वर्षांपासून रस्ताच बांधलेला नाही. रस्त्यावर काळीमाती जमा होऊन चिखल होतो. वेळोवेळी नगरसेवक आणि मनपाकडे तक्रार देऊनही पावले उचलली गेली नाही. अखेर वैतागून येथील नागरिकांनी झोपलेल्या मनपाला जागे करण्यासाठी सोमवारी (दि.२४) ‘मड रेसिंग’ ही अफलातून स्पर्धा आयोजित करून प्रतीकात्मक आंदोलन केले.
भगतसिंग गेट ते सारा रिद्धी सोसायटीदरम्यान आयोजित या स्पर्धेत परिसरातील नागरिक रस्त्यावर साचलेल्या चिखलातून धावले. ज्येष्ठ नागरिकांसाठी चिखलातून चालण्याची स्पर्धा होती. विजेत्यांना रोख बक्षिसे व पाठीचे व मानेचे बेल्ट वाटप करण्यात आले. ‘जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून गाडी चालविणे म्हणजे मोठी कसरत आहे. वाहन सोडा, पण या रस्त्यांवरून चालणेदेखील मुश्कील आहे. दररोज तीन-चार लोक गाडी घसरून पडतात. अशाच अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्याला मार लागला असून, उपचार सुरू आहे. परिस्थिती एवढी गंभीर असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही, असे शेखर काळे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न पाहणा-या औरंगाबाद शहरातील नागरिकांवर खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येते, यातच प्रशासनाची बेफिकीरी दिसून येते. बाळूसाहेब औताडे, वैजयंता मिसाळ, वंदना काळे, अश्विनी जंगले, राजेश धुरट, राजू तुपे, साई सुरे, वसंत गोसावी, अजय टाकळकर, जंगले साहेब, राहुल पाईकडे, सतीश इंगळे आदी नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
 
...नाही तर मुला-बाळांसह चिखलात बसू...
पुढील काही दिवसांत जर प्रशासनाने पावले उचलली नाही तर परिसरातील नागरिक आपल्या मुला-बाळांसह रस्त्यांवरील चिखलात बसून आंदोलन करतील, असा इशारा शेखर काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ते म्हणाले, खेड्यातील पांदीप्रमाणे असलेल्या रस्त्यांमुळे शहरात राहतोय असे वाटतच नाही. शाळेच्या बसदेखील या भागात येत नाहीत. एवढेच नाही तर नातेवाईकदेखील ‘तुमच्याकडे खूप चिखल आहे’ असे सांगून घरी येण्याचे टाळतात. आता तरी महापालिके ला लाज वाटेल अशी अपेक्षा आहे. 
 
नागरिकांना लवकरच रस्ता देणार
वॉर्डातील सिमेंट रस्त्यासाठी २० लाखांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी पुढील चार दिवसांमध्ये दोन लाख रुपये खर्च करून मुरुम व खडी टाकून नागरिकांना जाण्या-येण्या योग्य रस्ता करून देण्यात येईल. 
- बन्सी जाधव, नगरसेवक, हर्सूल वॉर्ड क्र. २