शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

औरंगाबाद महापालिकेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांची ‘चिखलफेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 22:53 IST

हर्सूल भागातील नागरिकांना सोमवारी सकाळी चिखलात पळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा ज्येष्ठ, सर्वच चिखलाने

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.24 -  हर्सूल भागातील नागरिकांना सोमवारी सकाळी चिखलात पळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा ज्येष्ठ, सर्वच चिखलाने माखलेले. बघणा-यांना हे दृश्य मजेशीर वाटेल. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या चिखलाचे शिंतोडे अंगावर घेत चालणाºया नागरिकांच्या संतापाचा हा उद्रेक होता.
हर्सूलमध्ये बहुतांश भागांतील रस्त्यांची स्थिती न बघण्यासारखी आहे. येथील वॉर्ड क्र .२ मध्ये तर मागच्या चार वर्षांपासून रस्ताच बांधलेला नाही. रस्त्यावर काळीमाती जमा होऊन चिखल होतो. वेळोवेळी नगरसेवक आणि मनपाकडे तक्रार देऊनही पावले उचलली गेली नाही. अखेर वैतागून येथील नागरिकांनी झोपलेल्या मनपाला जागे करण्यासाठी सोमवारी (दि.२४) ‘मड रेसिंग’ ही अफलातून स्पर्धा आयोजित करून प्रतीकात्मक आंदोलन केले.
भगतसिंग गेट ते सारा रिद्धी सोसायटीदरम्यान आयोजित या स्पर्धेत परिसरातील नागरिक रस्त्यावर साचलेल्या चिखलातून धावले. ज्येष्ठ नागरिकांसाठी चिखलातून चालण्याची स्पर्धा होती. विजेत्यांना रोख बक्षिसे व पाठीचे व मानेचे बेल्ट वाटप करण्यात आले. ‘जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून गाडी चालविणे म्हणजे मोठी कसरत आहे. वाहन सोडा, पण या रस्त्यांवरून चालणेदेखील मुश्कील आहे. दररोज तीन-चार लोक गाडी घसरून पडतात. अशाच अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्याला मार लागला असून, उपचार सुरू आहे. परिस्थिती एवढी गंभीर असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही, असे शेखर काळे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न पाहणा-या औरंगाबाद शहरातील नागरिकांवर खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येते, यातच प्रशासनाची बेफिकीरी दिसून येते. बाळूसाहेब औताडे, वैजयंता मिसाळ, वंदना काळे, अश्विनी जंगले, राजेश धुरट, राजू तुपे, साई सुरे, वसंत गोसावी, अजय टाकळकर, जंगले साहेब, राहुल पाईकडे, सतीश इंगळे आदी नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
 
...नाही तर मुला-बाळांसह चिखलात बसू...
पुढील काही दिवसांत जर प्रशासनाने पावले उचलली नाही तर परिसरातील नागरिक आपल्या मुला-बाळांसह रस्त्यांवरील चिखलात बसून आंदोलन करतील, असा इशारा शेखर काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ते म्हणाले, खेड्यातील पांदीप्रमाणे असलेल्या रस्त्यांमुळे शहरात राहतोय असे वाटतच नाही. शाळेच्या बसदेखील या भागात येत नाहीत. एवढेच नाही तर नातेवाईकदेखील ‘तुमच्याकडे खूप चिखल आहे’ असे सांगून घरी येण्याचे टाळतात. आता तरी महापालिके ला लाज वाटेल अशी अपेक्षा आहे. 
 
नागरिकांना लवकरच रस्ता देणार
वॉर्डातील सिमेंट रस्त्यासाठी २० लाखांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी पुढील चार दिवसांमध्ये दोन लाख रुपये खर्च करून मुरुम व खडी टाकून नागरिकांना जाण्या-येण्या योग्य रस्ता करून देण्यात येईल. 
- बन्सी जाधव, नगरसेवक, हर्सूल वॉर्ड क्र. २