शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

नागरिकांच्या बजेटला कट

By admin | Updated: April 4, 2017 01:04 IST

शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात खास निधीची तरतूद करण्यात येते.

पुणे : शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात खास निधीची तरतूद करण्यात येते. परंतु यंदा नागरिकांच्या बजेटला आयुक्तांनी मोठा कट लावला आहे. सन २०१७-१८ अंदाजपत्रकात यासाठी केवळ आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडून नागरिकांच्या सहभागाला खो घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहराच्या विकासामध्ये नागरिकांच्या थेट सहभागासाठी गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांचे बजेट हा खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध लहान-मोठी कामे सुचविल्यावर महापालिकेच्या वतीने यासाठी दर वर्षी निधीची तरतूद करून ही कामे केली जातात. यासाठी नागरिकांकडून कामांची यादी मागविली जाते, त्यावर या कामांची निवड करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली असते. ही समिती कामे अंतिम करून त्यावर खर्च टाकला जातो. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु महापालिकेच्या कामातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांचे बजेट यासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात येत आहे.प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांचा गेल्या काही वर्षांत ‘नागरिकांचे बजेट’ अंतर्गत मोठा सहभाग होता. परंतु यंदा याच मध्यवर्ती भागातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या बजेटसाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. यामध्ये औंध, घोले रोड, ढोले पाटील, नगर रोड, टिळक रोड, भवानी पेठ, सहकारनगर आणि कसबा पेठे, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांचे बजेटमध्ये या क्षेत्रीय कार्यालयांतील नागरिकांच्या कामांसाठी निधीची तरतूद नाही. सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकात आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांच्या कामांसाठी केवळ ८ कोटी ४ लाखांची तरतूद केली आहे. त्यामध्ये १४ क्षेत्रीय कार्यालयांतील केवळ ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामांसाठीच ही तरतूद आहे. गतवर्षीच्या (२०१६-१७) आयुक्तांच्या अंदाजपत्रकात १० कोटी ३९ लाखांची तरतूद होती. तर २०१४-१५ च्या अंदाजपत्रकात तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद होती. त्यात ७६ प्रभागांमधील रस्ते, ड्रेनेज, विद्युत अशा विविध कामांचा समावेश होता.