शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

राज्यातील शहरांना काविळीचा धोका

By admin | Updated: July 28, 2015 00:41 IST

वेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये

- राहुल कलाल,  पुणेवेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये काविळच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. गेल्या ४ वर्षात राज्यात आढळलेले कावीळचे रुग्ण प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजच्या उपनगरांमध्ये दिसून आले आहेत.गेल्या ४ वर्षांच्या आकडेवारीवरून शहरी भागांमध्ये त्यातही प्रामुख्याने शहराच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये काविळीचा उद्रेक होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत राज्य आरोग्य विभागाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात राज्यात काविळीचे उद्रेक हे प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. इचलकरंजी, अहमदनगर, जळगाव आदी याची उदाहरणे आहेत. शहरी भागात दाटीवाटीने राहणारे लोक, वाढती लोकसंख्या त्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळणे, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, १९६०-७० या दशकांमध्ये टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या पाईपलाईन न बदलणे आदींमुळे दूषित पाणी नागरिक पितात. त्यातून काविळीची लागण होत असल्याचे दिसून आले आहे.हिपॅटायटिस अर्थात काविळ या आजाराचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी ‘हिपॅटायटिस ए’ आणि ‘हिपॅटायटिस ई’ हे दोन प्रमुख प्रकार दूषित पाणी, दूषित अन्नाच्या सेवनामुळे होतात. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही भागांमध्ये काविळीचा उद्रेक होतो. यामध्ये प्रामुख्याने शहरी भाग त्यातही शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा आजूबाजूला उपनगराच्या रूपात पसरणाऱ्या भागात काविळीचा उद्रेक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत राज्यात काविळीचे ९ उद्रेक झाले आहेत. यात २६६ जणांना काविळीची लागण झाली असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात यंदा जळगाव शहर व आजूबाजूच्या परिसरात काविळीचा उद्रेक झाला होता. त्यात तेथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबर यावर्षी सांगली, नागपूर, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या शहर व आजूबाजूंच्या परिसरामध्येही काविळीचे उद्रेक झाले आहेत. याअगोदर २०१४ मध्ये राज्यात काविळीचे १३ उद्रेक झाले आणि यात १ हजार ७७५ जणांना काविळीची लागण झाली होती. तीन जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षात अहमदनगर शहर व परिसरात काविळीचे भीषण उद्रेक पहायला मिळाले.२०१३ मध्ये राज्यात काविळीची तीव्रता कमी झाल्याचे चित्र होते. राज्यात उद्रेक झाले तरी कमी रुग्णांना काविळीची लागण झाली होती. या वर्षात राज्यात काविळीचे १२ उद्रेक झाले. त्यात ३३३ जणांना काविळीची लागण झाली होती आणि ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ हे वर्ष काविळीने हादरविले होते. यावर्षात इचलकरंजीमध्ये काविळीचा सर्वात मोठा उद्रेक झाला होता. या वर्षात काविळीची लागण झालेल्या तब्बल ६ हजार ३३७ रुग्णांपैकी ४२ जणांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०० रूण एका इचलकरंजीमधून सापडले होते. यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.