शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राज्यातील शहरांना काविळीचा धोका

By admin | Updated: July 28, 2015 00:41 IST

वेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये

- राहुल कलाल,  पुणेवेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये काविळच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. गेल्या ४ वर्षात राज्यात आढळलेले कावीळचे रुग्ण प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजच्या उपनगरांमध्ये दिसून आले आहेत.गेल्या ४ वर्षांच्या आकडेवारीवरून शहरी भागांमध्ये त्यातही प्रामुख्याने शहराच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये काविळीचा उद्रेक होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत राज्य आरोग्य विभागाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात राज्यात काविळीचे उद्रेक हे प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. इचलकरंजी, अहमदनगर, जळगाव आदी याची उदाहरणे आहेत. शहरी भागात दाटीवाटीने राहणारे लोक, वाढती लोकसंख्या त्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळणे, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, १९६०-७० या दशकांमध्ये टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या पाईपलाईन न बदलणे आदींमुळे दूषित पाणी नागरिक पितात. त्यातून काविळीची लागण होत असल्याचे दिसून आले आहे.हिपॅटायटिस अर्थात काविळ या आजाराचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी ‘हिपॅटायटिस ए’ आणि ‘हिपॅटायटिस ई’ हे दोन प्रमुख प्रकार दूषित पाणी, दूषित अन्नाच्या सेवनामुळे होतात. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही भागांमध्ये काविळीचा उद्रेक होतो. यामध्ये प्रामुख्याने शहरी भाग त्यातही शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा आजूबाजूला उपनगराच्या रूपात पसरणाऱ्या भागात काविळीचा उद्रेक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत राज्यात काविळीचे ९ उद्रेक झाले आहेत. यात २६६ जणांना काविळीची लागण झाली असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात यंदा जळगाव शहर व आजूबाजूच्या परिसरात काविळीचा उद्रेक झाला होता. त्यात तेथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबर यावर्षी सांगली, नागपूर, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या शहर व आजूबाजूंच्या परिसरामध्येही काविळीचे उद्रेक झाले आहेत. याअगोदर २०१४ मध्ये राज्यात काविळीचे १३ उद्रेक झाले आणि यात १ हजार ७७५ जणांना काविळीची लागण झाली होती. तीन जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षात अहमदनगर शहर व परिसरात काविळीचे भीषण उद्रेक पहायला मिळाले.२०१३ मध्ये राज्यात काविळीची तीव्रता कमी झाल्याचे चित्र होते. राज्यात उद्रेक झाले तरी कमी रुग्णांना काविळीची लागण झाली होती. या वर्षात राज्यात काविळीचे १२ उद्रेक झाले. त्यात ३३३ जणांना काविळीची लागण झाली होती आणि ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ हे वर्ष काविळीने हादरविले होते. यावर्षात इचलकरंजीमध्ये काविळीचा सर्वात मोठा उद्रेक झाला होता. या वर्षात काविळीची लागण झालेल्या तब्बल ६ हजार ३३७ रुग्णांपैकी ४२ जणांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०० रूण एका इचलकरंजीमधून सापडले होते. यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.