शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

सवंग लोकप्रियतेसाठी तिजोरीची तूट

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

सर्वसामान्य जनतेला ज्या मुद्द्याची सर्वाधिक झळ बसते त्या महागाईच्या मुद्द्यापासून आपण वेध घेऊ. महागाईविरोधात लोकांनी मतदान केल्याचे बोलले जात होते

सर्वसामान्य जनतेला ज्या मुद्द्याची सर्वाधिक झळ बसते त्या महागाईच्या मुद्द्यापासून आपण वेध घेऊ. महागाईविरोधात लोकांनी मतदान केल्याचे बोलले जात होते, पण आता तीच महागाई लोकांच्या डोक्यावर येऊन बसली आहे. एक-दोन नव्हे, तर सरसकट सगळ्याच वस्तूंची भाववाढ झालेली दिसते. याचे कोणतेही ठोस उत्तर राज्य आणि केंद्र या दोघांकडे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल १४० अमेरिकी डॉलर इतक्या होत्या, त्यावरून आता हे दर घसरून प्रति बॅरल ४० अमेरिकी डॉलर इतके खाली आहेत. त्यामुळे महागाई राहण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशात डाळींचे दर वाढले आहेत. त्याकडे लक्ष देतानाच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले असते तर आज डाळ आयात करायची वेळ आली नसती. शेतकऱ्याला मदत न करता परदेशातून अव्वाच्या सव्वा दराने डाळ आयात करायची ही परदेशातील शेतकऱ्यालाच मदत करायची या सरकारची नीती दिसते. एलबीटी आणि टोल माफीचे निर्णय अतार्किक वाटतात. टोल माफीचा निर्णय लोकप्रिय जरी असला तरी वस्तुस्थितीचा विचार केला तर या निर्णयामुळे आगामी तीन वर्षांत रस्त्यांचा दर्जा घसरताना दिसेल. एकीकडे रस्त्यांची देखभाल करणे कठीण होणार आहे तर दुसरीकडे टोल माफी केल्यामुळे रस्त्यांच्या बांधणीनंतर त्याकरिता संबंधित कंपन्यांना काही हजार कोटी रुपये सरकारला तिजोरीतून द्यावे लागतील, त्याचा ताणही सरकारी तिजोरीवरच पडणार आहे. तर दुसरीकडे एलबीटी माफ केला असला तरी, बुडालेल्या महसुलाची जोडणी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी करातून मिळणारा पैसा जर तिथे वळविला जाणार असेल तर अनेक नव्या उपाययोजनांना निधीअभावी मुकावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी अर्थसंकल्पात वित्तीय तूट १० ते १२ हजार कोटींवर जाईल व आर्थिक डोलारा सांभाळताना अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. नव्या उद्योगांची निर्मिती, रोजगारनिर्मिती व उद्योगाचा विकास याकरिता सरकार गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही. उत्पन्नाचे पंख स्वत:च छाटून टाकले आहेतअर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात साडे तीन हजार कोटी रुपयांची तूट आहे. त्यात आता टोल माफी आणि एलबीटी (स्थानिक स्वराज्य संस्था कर) रद्द करून महसुली उत्पन्नाचे पंख स्वत:च छाटून टाकले आहेत. आधीची वित्तीय तूट आणि या महसुली उत्पन्नातील कपातीमुळे पुढच्या अर्थसंकल्पात हीच तूट ८ हजार कोटी रुपयांवर पोहोचलेली दिसेल. या तुलनेत नवीन महसुली उत्पन्न निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून मागच्या सरकारने काही शिल्लक ठेवले नाही अशी हाकाटी पिटली जाते. पण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. १९९९ साली मी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्या वेळी राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हा सकल उत्पन्नाच्या २६ टक्के इतका झाला होता. कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरले आणि राज्याची स्थिती मजबूत करत आम्ही प्रयत्नपूर्वक कर्जाचे हेच प्रमाण सतरा ते साडे सतरा टक्के इतके खाली आणले. याचा अर्थ राज्य सरकारची वित्तीय स्थिती पूर्ण आटोक्यात आहे.