शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

सवंग लोकप्रियतेसाठी तिजोरीची तूट

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

सर्वसामान्य जनतेला ज्या मुद्द्याची सर्वाधिक झळ बसते त्या महागाईच्या मुद्द्यापासून आपण वेध घेऊ. महागाईविरोधात लोकांनी मतदान केल्याचे बोलले जात होते

सर्वसामान्य जनतेला ज्या मुद्द्याची सर्वाधिक झळ बसते त्या महागाईच्या मुद्द्यापासून आपण वेध घेऊ. महागाईविरोधात लोकांनी मतदान केल्याचे बोलले जात होते, पण आता तीच महागाई लोकांच्या डोक्यावर येऊन बसली आहे. एक-दोन नव्हे, तर सरसकट सगळ्याच वस्तूंची भाववाढ झालेली दिसते. याचे कोणतेही ठोस उत्तर राज्य आणि केंद्र या दोघांकडे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल १४० अमेरिकी डॉलर इतक्या होत्या, त्यावरून आता हे दर घसरून प्रति बॅरल ४० अमेरिकी डॉलर इतके खाली आहेत. त्यामुळे महागाई राहण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशात डाळींचे दर वाढले आहेत. त्याकडे लक्ष देतानाच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले असते तर आज डाळ आयात करायची वेळ आली नसती. शेतकऱ्याला मदत न करता परदेशातून अव्वाच्या सव्वा दराने डाळ आयात करायची ही परदेशातील शेतकऱ्यालाच मदत करायची या सरकारची नीती दिसते. एलबीटी आणि टोल माफीचे निर्णय अतार्किक वाटतात. टोल माफीचा निर्णय लोकप्रिय जरी असला तरी वस्तुस्थितीचा विचार केला तर या निर्णयामुळे आगामी तीन वर्षांत रस्त्यांचा दर्जा घसरताना दिसेल. एकीकडे रस्त्यांची देखभाल करणे कठीण होणार आहे तर दुसरीकडे टोल माफी केल्यामुळे रस्त्यांच्या बांधणीनंतर त्याकरिता संबंधित कंपन्यांना काही हजार कोटी रुपये सरकारला तिजोरीतून द्यावे लागतील, त्याचा ताणही सरकारी तिजोरीवरच पडणार आहे. तर दुसरीकडे एलबीटी माफ केला असला तरी, बुडालेल्या महसुलाची जोडणी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी करातून मिळणारा पैसा जर तिथे वळविला जाणार असेल तर अनेक नव्या उपाययोजनांना निधीअभावी मुकावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी अर्थसंकल्पात वित्तीय तूट १० ते १२ हजार कोटींवर जाईल व आर्थिक डोलारा सांभाळताना अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. नव्या उद्योगांची निर्मिती, रोजगारनिर्मिती व उद्योगाचा विकास याकरिता सरकार गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही. उत्पन्नाचे पंख स्वत:च छाटून टाकले आहेतअर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात साडे तीन हजार कोटी रुपयांची तूट आहे. त्यात आता टोल माफी आणि एलबीटी (स्थानिक स्वराज्य संस्था कर) रद्द करून महसुली उत्पन्नाचे पंख स्वत:च छाटून टाकले आहेत. आधीची वित्तीय तूट आणि या महसुली उत्पन्नातील कपातीमुळे पुढच्या अर्थसंकल्पात हीच तूट ८ हजार कोटी रुपयांवर पोहोचलेली दिसेल. या तुलनेत नवीन महसुली उत्पन्न निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून मागच्या सरकारने काही शिल्लक ठेवले नाही अशी हाकाटी पिटली जाते. पण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. १९९९ साली मी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्या वेळी राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हा सकल उत्पन्नाच्या २६ टक्के इतका झाला होता. कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरले आणि राज्याची स्थिती मजबूत करत आम्ही प्रयत्नपूर्वक कर्जाचे हेच प्रमाण सतरा ते साडे सतरा टक्के इतके खाली आणले. याचा अर्थ राज्य सरकारची वित्तीय स्थिती पूर्ण आटोक्यात आहे.