शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

फडणवीस सरकारला सीआयडीचा रेड अ‍ॅलर्ट

By admin | Updated: February 5, 2015 01:38 IST

देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्याचे मूल्यांकन करताना राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) निवडक मंत्री वगळता इतरांच्या कामगिरीबाबत रेड अ‍ॅलर्ट दिला

यदु जोशी - मुंबईदेवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्याचे मूल्यांकन करताना राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) निवडक मंत्री वगळता इतरांच्या कामगिरीबाबत रेड अ‍ॅलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. नवीन सरकारला १०० दिवस पूर्ण होत असताना सीआयडीने जनतेला सरकारबद्दल काय वाटते या विषयीचा ‘फीड बॅक रिपोर्ट’ दिला आहे. नवीन सरकारने आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी गतिमान आणि पारदर्शक कारभाराच्या संदर्भात तसेच औद्योगिक गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने केलेल्या घोषणांबद्दल लोकांमध्ये चांगली प्रतिक्रिया असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण या सरकारमधील सर्व मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक आहे असे मात्र नाही. निवडक पाच-सहा मंत्र्यांची खात्यावर चांगली पकड बसली असली तरी अन्य कॅबिनेट मंत्री आणि एखाद-दोन अपवाद वगळता बहुतेक सर्व राज्यमंत्र्यांचा अद्याप जम बसायचा आहे, असे मत गुप्तचर यंत्रणेने नोंदविले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने सीआयडीकडून असा ‘फीड बॅक’ मिळाला असल्याचे मान्य केले. सूत्रांनी असेही सांगितले की, नवीन सरकारच्या घोषणा अतिशय चांगल्या आहेत पण त्यांची अंमलबजावणीही नजीकच्या काळात दिसणे नागरिकांना अपेक्षित आहे. आधीच्या सरकाच्या तुलनेत या सरकारची विश्वासार्हता अधिक दिसते पण अंमलबजावणीच्या पातळीवर साशंकतादेखील बोलून दाखविली गेली. भाजपाचे मंत्री एकत्र बसणारच्राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि बाहेरही काही मंत्री करीत असलेल्या विधानांमुळे बरेचदा गोंधळ निर्माण होतो. भाजपाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, असे चित्र त्यातून निर्माण होते. एकनाथ खडसेंसारखे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याचेही वारंवार समोर येते. या पार्श्वभूमीवर, भाजपाच्या निदान काही ज्येष्ठ मंत्र्यांची मुख्यमंत्री दर आठवड्याला वा नियमितपणे बैठक घेतील आणि वादाच्या मुद्यांवर त्यात चर्चा होईल, अशी शक्यता आहे.