शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

रजेनंतरची ‘चोरवाट’ होणार बंद!

By admin | Updated: April 9, 2016 03:52 IST

दीर्घ कारणामुळे रुग्णनिवेदन (सिक) रजा किंवा गैरहजेरीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर न होता परस्पर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संगनमत करुन सोयीनुसार कर्तव्यावर हजर

मुंबई : दीर्घ कारणामुळे रुग्णनिवेदन (सिक) रजा किंवा गैरहजेरीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर न होता परस्पर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संगनमत करुन सोयीनुसार कर्तव्यावर हजर होण्याची मुंबई पोलीस दलातील अधिकारी/अंमलदाराची ‘चोरवाट’आता लवकरच पूर्णपणे बंद होणार आहे. त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यासाठी पहिल्यांदा संबंधित पोलीस उपायुक्तांसमोर आवश्यक कागदपत्रानिशी उपस्थित रहावे लागणार आहे. त्यांच्या संमतीनंतरच त्यांना कर्तव्यावर हजर होता येणार आहे.खोटी कारणे दर्शवित सुट्टी उपभोगणाऱ्या पोलिसांना चाप बसवण्यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी त्याबाबत सूचना दिल्या आहेत. परिमंडळ-१ चे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आपल्या कार्यश्रेत्रात त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. पोलीस दलात प्रामाणिक अधिकारी, अंमलदाराबरोबरच काही कामचुकार व पदाचा गैरफायदा घेणारेही आहेत. या गैरकृत्यांचा तसेच दांडी मारण्याचा फटका कर्तव्यदक्ष पोलिसांना बसतो. कसलाही आजार नसताना केवळ ड्युटी, महत्त्वाचा बंदोबस्त चुकविण्यासाठी काही जण ‘सिक’ रिपोर्ट करतात, किंवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय गैरहजर रहातात. त्यानंतर स्वत:च्या सोयीनुसार पुन्हा कर्तव्यावर हजर होतात. त्यासाठी डॉक्टरांशी संगनमत करुन प्रमाणपत्र मिळवितात, वास्तविक त्यांना पहिल्यादा संबंधित परिमंडळ/ शाखेतील पोलीस उपायुक्तांच्या समोर हजर होवून त्यांच्याकडून परवानगी घ्यावयाची असते. मात्र त्यांच्याकडून खरडपट्टी होण्याच्या भीतीने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी /ड्यूटी कारकून किंवा सहाय्यक आयुक्ताशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करुन हजर होतात. संबंधित पोलीस उपायुक्ताची बदली झाल्यानंतर किंवा दीर्घ रजा अथवा प्रशिक्षणासाठी रवाना झाल्यानंतर त्याच्याऐवजी आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रे सादर करुन त्यांची मंजुरी घेतली जाते. नवीन उपायुक्ताला त्याच्या गैरहजरीमुळे इतर पोलिसांवर पडलेला ताण किंवा निर्माण झालेल्या अडचणीची कल्पना नसते, त्यामुळे ते त्यांची मागील काळातील रजा नियमित करुन देतात. असे प्रकार सर्रास घडत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी त्याला पायबंद घालण्यासाठी रुग्णनिवेदन किंवा गैरहजेरीनंतर कर्तव्यावर येण्यासाठी आधी उपायुक्तांची परवानगी घेणे सक्तीचे केले आहे. त्यांच्याकडून योग्य ती मिमांंसा होणार असल्याने इतर गरजू अधिकारी/कर्मचाऱ्यांना सुट्टी व बंदोबस्तामध्ये सवलत मिळू शकणार आहे. परिमंडळ-१चे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्याबाबत हद्दीतील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)