शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राष्ट्रपतीपदाची निवड मोदींनी ठरवल्यास बिनविरोध

By admin | Updated: April 25, 2017 02:17 IST

: पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर

सोलापूर : पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले़संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी समितीच्या वतीने खा. पवार यांचा सोलापुरात नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून शरद पवार यांचे नाव चर्चिले जात आहे. माकपचे सीताराम येचुरी यांनी तर राष्ट्रपतीपदासाठी पवार हेच योग्य उमेदवार ठरतील, असे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, देशाच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रवादीचे अवघे १४ संख्याबळ असताना मी राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही़ दोन्ही सभागृहांत मिळून एनडीएचे संख्याबळ अधिक आहे़ शिवाय, उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर त्यात वाढ झाली आहे़ मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. देशात मोदी यांची लाट सुरू आहे़ ही लाट कायम राहणार नाही़, पण मोदी व भाजपासमोर सक्षम विरोधक नसल्यामुळे लोक भाजपाच्या बाजूने मतदान करीत आहेत़ ही परिस्थिती काही दिवसांनी बदलेल, असा दावाही पवार यांनी केला. (प्रतिनिधी)साखर कारखाने पूर्वपदावर आणणार-राज्यात पाण्याअभावी साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट झाली आहे़ काही कारखाने अडचणीत सापडले आहेत़ राज्यातील साखर कारखाने पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्यासमवेत बैठक घेऊन कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढणार असल्याचेही पवार म्हणाले.उजनीत येणारे घाण पाणी थांबविणार : पुणे शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी उजनी धरणातील पाण्यात मिसळत आहे़ पालिकेला मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गरज आहे़ केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनीत येणारे घाण पाणी थांबविण्यास मदत होईल, असेही पवार यांनी सांगितले़