शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

राष्ट्रपतीपदाची निवड मोदींनी ठरवल्यास बिनविरोध

By admin | Updated: April 25, 2017 02:17 IST

: पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर

सोलापूर : पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले़संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी समितीच्या वतीने खा. पवार यांचा सोलापुरात नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून शरद पवार यांचे नाव चर्चिले जात आहे. माकपचे सीताराम येचुरी यांनी तर राष्ट्रपतीपदासाठी पवार हेच योग्य उमेदवार ठरतील, असे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, देशाच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रवादीचे अवघे १४ संख्याबळ असताना मी राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही़ दोन्ही सभागृहांत मिळून एनडीएचे संख्याबळ अधिक आहे़ शिवाय, उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर त्यात वाढ झाली आहे़ मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. देशात मोदी यांची लाट सुरू आहे़ ही लाट कायम राहणार नाही़, पण मोदी व भाजपासमोर सक्षम विरोधक नसल्यामुळे लोक भाजपाच्या बाजूने मतदान करीत आहेत़ ही परिस्थिती काही दिवसांनी बदलेल, असा दावाही पवार यांनी केला. (प्रतिनिधी)साखर कारखाने पूर्वपदावर आणणार-राज्यात पाण्याअभावी साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट झाली आहे़ काही कारखाने अडचणीत सापडले आहेत़ राज्यातील साखर कारखाने पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्यासमवेत बैठक घेऊन कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढणार असल्याचेही पवार म्हणाले.उजनीत येणारे घाण पाणी थांबविणार : पुणे शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी उजनी धरणातील पाण्यात मिसळत आहे़ पालिकेला मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गरज आहे़ केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनीत येणारे घाण पाणी थांबविण्यास मदत होईल, असेही पवार यांनी सांगितले़