शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

राष्ट्रपतीपदाची निवड मोदींनी ठरवल्यास बिनविरोध

By admin | Updated: April 25, 2017 02:17 IST

: पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर

सोलापूर : पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले़संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी समितीच्या वतीने खा. पवार यांचा सोलापुरात नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून शरद पवार यांचे नाव चर्चिले जात आहे. माकपचे सीताराम येचुरी यांनी तर राष्ट्रपतीपदासाठी पवार हेच योग्य उमेदवार ठरतील, असे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, देशाच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रवादीचे अवघे १४ संख्याबळ असताना मी राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही़ दोन्ही सभागृहांत मिळून एनडीएचे संख्याबळ अधिक आहे़ शिवाय, उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर त्यात वाढ झाली आहे़ मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. देशात मोदी यांची लाट सुरू आहे़ ही लाट कायम राहणार नाही़, पण मोदी व भाजपासमोर सक्षम विरोधक नसल्यामुळे लोक भाजपाच्या बाजूने मतदान करीत आहेत़ ही परिस्थिती काही दिवसांनी बदलेल, असा दावाही पवार यांनी केला. (प्रतिनिधी)साखर कारखाने पूर्वपदावर आणणार-राज्यात पाण्याअभावी साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट झाली आहे़ काही कारखाने अडचणीत सापडले आहेत़ राज्यातील साखर कारखाने पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्यासमवेत बैठक घेऊन कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढणार असल्याचेही पवार म्हणाले.उजनीत येणारे घाण पाणी थांबविणार : पुणे शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी उजनी धरणातील पाण्यात मिसळत आहे़ पालिकेला मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गरज आहे़ केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनीत येणारे घाण पाणी थांबविण्यास मदत होईल, असेही पवार यांनी सांगितले़