शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय

By admin | Updated: January 28, 2017 23:52 IST

शरद पवार : शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल

कोल्हापूर : भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. युती तुटल्यामुळे शिवसेना आता सरकारमध्ये राहील, असे वाटत नाही आणि राहिलीच तर मात्र, सत्तेसाठी हा पक्ष काहीही करतो असा समज जाईल, असाही चिमटा पवार यांनी घेतला. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना युती तुटल्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर आहे असे आपणास वाटते का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, सरकार चालविण्याचा भाजपा नक्कीच प्रयत्न करील, पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेऊ. शांतपणे पक्षाच्या शिस्तीत बसेल, अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल. यासाठी समविचारी पक्षांशीही आम्ही चर्चा करू.भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का, अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले, आमचा भाजपाला कधीही पाठिंबा राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यातील निवडणुका झाल्यानंतर युती होत नसेल, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात पाठिंबा दिलेला नव्हता.राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी, ही काही देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने दिले आहे. त्याचा पक्षाच्या धोरणांशी काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. (प्रतिनिधी)निरुपम हा मूर्ख माणूस...भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचे कॉँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पवार उसळून म्हणाले, निरुपम हा मूर्ख माणूस आहे. या माणसाचे राज्यासाठी योगदान काय आहे? त्यांनी मुंबईला आणि कोल्हापूरला काय दिले? त्यांचा राज्याच्या राजकारणाशी कसलाही संबंध नाही. पदावरून गेल्यावर यांना कोणी ओळखतही नाही.राष्ट्रपतीपदाबाबत अपेक्षा गैर...शरद पवार राष्ट्रपती होणार अशी चर्चा नेहमी सुरू असते. याबाबत छेडले असता, पवार यांनी चर्चेत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता बोलून दाखविली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा खासदार आहेत. पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भलतीच अपेक्षा करणे अयोग्य आहे. आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. अशा प्रकारची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.