शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

चित्रा वाघ यांच्या संस्थेची एसीबीमार्फत चौकशी करा

By admin | Updated: January 3, 2016 02:35 IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या दीक्षा सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून, या संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट

- यदु जोशी,  मुंबईराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या दीक्षा सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून, या संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट देण्यात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) करावी, अशी शिफारस सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी राज्य कर्मचारी आरोग्य विमा योजनेचे आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली असून, या संस्थेला २०१०पासून अलीकडेपर्यंत निविदेविनाच अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आल्याचा ठपका या समितीने ठेवला होता. ‘लोकमत’ने हा अहवाल फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोग्यमंत्री सावंत यांनी नागपूर अधिवेशनात विधानसभेत हा अहवाल सादर केला होता. सूत्रांनी सांगितले की, हा अहवाल मांडू नये आणि त्यानंतर त्यावर कारवाईदेखील करू नये, असा दबाव डॉ. सावंत यांच्यावर काही जणांकडून आला होता. मात्र, तो झुगारून त्यांनी अहवाल केवळ मांडलाच नाही, तर अहवालातील निष्कर्षांची चौकशी एसीबीमार्फत करावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.दीक्षा सामाजिक संस्थेला निविदा न काढता कंत्राट देण्याऐवजी निविदा काढून कंत्राट दिले असते, तर चांगल्या प्रतीचे व कमी किमतीमध्ये अन्नधान्य मिळाले असते आणि शासनाच्या पैशात बचत झाली असती, असे चौकशी अहवालात म्हटले होते. आरोग्यमंत्र्यांनी एसीबी चौकशीची मागणी केली असताना, आता त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, या बाबत उत्सुकता आहे. चव्हाण यांची संदिग्ध भूमिका सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यासन अधिकारी सुहास चव्हाण यांनी अन्नधान्य पुरवठ्याचे २००९ पासूनचे जीआर काढले. विनानिविदा एकाच एक संस्थेला कंत्राट मिळावेत, या दृष्टीने हे जीआर काढल्याचे दिसते. असे असताना चव्हाण यांच्यावर आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत कुठलीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अद्यापही पुरवठा सुरूच धक्कादायक म्हणजे, दीक्षा सामाजिक संस्थेच्या अन्नधान्य पुरवठ्याचा अहवाल विधानसभेत सादर झाला. चौकशी समितीने एकूणच प्रक्रियेवर ताशेरेही ओढले. तरीही या संस्थेमार्फत रुग्णालयांना अन्नधान्याचा पुरवठा अद्याप सुरूच असल्याची खात्रीलायक माहिती आहे.