शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

चिमुरड्यांनी साकारला तोरणा किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 02:46 IST

आधुनिक युगात किल्ला आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे.

कर्जत : आधुनिक युगात किल्ला आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे. परंतु कर्जत येथील पाटील आळी मित्र मंडळ गेली कित्येक वर्षे किल्ल्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी किल्ल्याची प्रतिकृती साकारत आहे. या वर्षी मंडळाने तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून, मंडळाचे हे दहावे वर्ष आहे.मंडळाचे चिमुरडे सदस्य जो किल्ला बनवायचा आहे त्या किल्ल्यावर दिवाळी अगोदर जातात. त्या किल्ल्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती घेऊन दिवाळीत किल्ल्याची प्रतिकृती बनवतात. या उपक्र मामुळे मुलांना आपला इतिहास समजण्याबरोबरच प्रत्यक्ष किल्ला पाहता येतो. या वर्षी मंडळाने तोरणा किल्ल्याला भेट देऊन त्याची प्रतिकृती साकारली. किल्ल्यावर कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, कोठी दरवाजा, झुंजार माची, बुदला माची, पाण्याच्या टाक्या, दारूगोळा कोठार, मेगाई मंदिर, महादेव मंदिर आदी ठिकाणे दाखवली आहेत. मंडळाने याआधी रायगड, प्रतापगड, सिंहगड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. मंडळाचे चिमुरडे सदस्य चिन्मय शर्मा, दिव्या शर्मा, अनुज गुप्ता, वेदिका गुप्ता, तनिष्का गुरव, ओंकार हजारे, प्रणव दळवी, आर्यन गुरव, नंदिनी गुरव, साहिल हजारे, श्रावणी हजारे यांनी तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारला आहे. (वार्ताहर)>फळे-भाज्यांपासून किल्लाबिरवाडी : दिवाळीत बच्चे कंपनीकडून मातीचे किल्ले बनविण्यात येतात. यासाठी माती, दगड, विटा गोळा करण्यासाठी त्यांची सुटी लागल्यापासून लगबग सुरू असते. यंदा बिरवाडीतील प्राजक्ता गोखले महाविद्यालयीन तरुणीने फळे-भाज्यांपासून तयार केलेला किल्ला बनवला असून तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे. किल्ला बनविण्यासाठी भोपळा, कलिंगड, अननस, बटाटे, कांदे, केळी, बीट आदींचा यांचा वापर केला आहे. सिंहासन, पायऱ्या, तटबंदी, प्रवेशद्वारांसाठीही फळांचा वापर करण्यात आला असून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, हा संदेश देण्यात आला आहे.