शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चिमुकलीचे सिनेस्टाईल अपहरण पडले महागात

By admin | Updated: November 21, 2014 00:52 IST

ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेल्या शिवानी गजबे या चार वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून

दोघांना अटक : रायपूर रेल्वे स्थानकावरून मुलगी पोलिसांच्या ताब्यातचंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेल्या शिवानी गजबे या चार वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून शिवानीला रायपूर (छत्तीसगड) रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले. मुलगी सुखरुप असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केली. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेऊन माहिती दिली. कबिंद्र लाजपतसिंग ठाकूर (२३) रा. ढकीया जि. रायपूर (छत्तीसगड) व अमित दिलीप थापा (२०) रा. तहेली, ता. जि. ओकरुर (मणिपूर) अशी अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. १९ नोव्हेंबरला शाळा सुटल्यावर आरोपीने शिवानीचे अपहरण करुन खंडणीची मागणी केली होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी मुलीच्या शोधासाठी एका विशेष पथकाला रवाना केले. मात्र शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून शिवानीच्या वडिलांचा व्यावसायिक भागिदार असलेल्या कबिंद्रला देसाईगंज येथे ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने आपणच मुलीचे अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी दम दिल्यानंतर कबिंद्रने मोबाईलवरुन दुसरा आरोपी अमित याच्याशी संपर्क साधला. तेव्हा अमित हा मुलीला घेऊन गोंदियावरुन रेल्वेने रायपूरला निघाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तिकस यांच्या नेतृत्वात पोलीस पथक रायपूरला रवाना झाले. तेथे अमितला पकडून शिवानीला ताब्यात घेण्यात आले. पोलिस पथक शिवानीला घेऊन आज सकाळी ६ वाजता ब्रह्मपुरी येथे दाखल झाले. तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपी कबिंद्र ठाकूर व अमित थापा याच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा तपास ब्रह्मपुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)मुलीचा प्रवास ब्रह्मपुरी-देसाइगंज-गोंदिया-रायपूरकबिंद्र हा मुलीच्या घरी नेहमी येत असल्याने त्याला ती ओळखत होती. त्यामुळे ती शाळा सुटल्यावर त्याच्यासोबत सहज गेली. कबिंद्रने तिचे अपहरण करुन देसाईगंज (गडचिरोली) येथे नेले. त्यानंतर त्याने आपला सहकारी अमित थापा याला बोलावून तिला त्याच्या ताब्यात दिले व १२. ४५ वाजता रेल्वेने दोघांनाही गोंदिया येथे रवाना केले. आपल्यावर कुणाचाही संशय येऊ नये, यासाठी कबिंद्र देसाईगंज येथे फिरत होता.