शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा विमानतळावर थरार

By admin | Updated: May 8, 2014 00:43 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ७.३० वाजता मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे धक्कादायक लँडिंग शेकडो प्रवाशांना भयावह अनुभव देऊन गेले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ७.३० वाजता मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे धक्कादायक लँडिंग शेकडो प्रवाशांना भयावह अनुभव देऊन गेले. विमान उतरल्यानंतर पुन्हा हवेत उडून नागमोडी होत धावपट्टीवर गेले. विमान डाव्या बाजूने झुकल्यानंतर पुन्हा सरळ झाल्याचा अनुभव आतील प्रवाशांना आल्यामुळे अनेकांनी जीव मुठीत धरला होता. विमानातून बाहेर पडेपर्यंत अनेकजण धास्तावले होते. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमान नियंत्रित झाल्याने मोठा अपघात टळला. काही क्षणांचा तो थरार भयावह होता. विमानातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास टाकला. राजकीय नेते, उद्योगपती आणि प्रशासकीय अधिकारी त्या विमानात होते. विमानात राज्यमंत्री सुरेश धस, आ. अब्दुल सत्तार, इंड्रीस हाऊजरचे अधिकारी, उद्योगपती नहार, डॉ. कानन येळीकर यांच्यासह उद्योगपती उल्हास गवळी, तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे आदी अधिकारी होते. धावपट्टीवरील थरारातून सुटल्यानंतर राज्यमंत्री धस आणि आ. सत्तार यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी ते जेटच्या व्यवस्थापनाकडे गेले, तर उर्वरित प्रवाशांनी बालंबाल बचावलो असे म्हणत विमानतळ सोडले. च्जेट एअरवेजच्या प्रशासकीय सूत्रांनुसार तांत्रिक कारणांमुळे विमानाने ‘हार्ड लँडिंग’ केली, ज्यामुळे प्रवाशांना जोरदार धक्का बसला; पण विमानाने धावपट्टी सोडली नव्हती. च्वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. शिवाय नवीन प्रवासी असतात, त्यांना धक्का बसल्यासारखे वाटत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. या प्रकाराबद्दल कुणीही तक्रार केली नसल्याचे जेटच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. विमानाला ३ तास उशीर च्जेटचे ते विमान ३ तास अ‍ॅप्रनवर होते. त्या विमानाची परत जाण्याची वेळ ८.३० वाजेची होती. मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आहे का याची चाचपणी करण्यासाठी ते अ‍ॅप्रन थांबविण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तो अनुभव भयावह च्उद्योगपती उल्हास गवळी यांनी तो १५ सेकंदांचा क्षण लोकमतशी बोलताना व्यक्त केला. च्ते म्हणाले, विमान डाव्या बाजूने झुकल्याचे जाणवले. च्विमानाने धावपट्टी सोडली असती तर मोठा अपघातही झाला असता; मात्र पायलटच्या नियंत्रणामुळे व प्रवाशांच्या सुदैवाने तसे काहीही झाले नाही. च्मी अनेक वर्षांपासून विमानाने प्रवास करतो; मात्र आजच्या लँडिंगचा अनुभव भयावह होता.