शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
4
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
5
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
6
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
7
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
8
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
9
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
12
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
13
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
14
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
17
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
18
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
19
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
20
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

चिकलठाणा विमानतळावर थरार

By admin | Updated: May 8, 2014 00:43 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ७.३० वाजता मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे धक्कादायक लँडिंग शेकडो प्रवाशांना भयावह अनुभव देऊन गेले.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री ७.३० वाजता मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाचे धक्कादायक लँडिंग शेकडो प्रवाशांना भयावह अनुभव देऊन गेले. विमान उतरल्यानंतर पुन्हा हवेत उडून नागमोडी होत धावपट्टीवर गेले. विमान डाव्या बाजूने झुकल्यानंतर पुन्हा सरळ झाल्याचा अनुभव आतील प्रवाशांना आल्यामुळे अनेकांनी जीव मुठीत धरला होता. विमानातून बाहेर पडेपर्यंत अनेकजण धास्तावले होते. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमान नियंत्रित झाल्याने मोठा अपघात टळला. काही क्षणांचा तो थरार भयावह होता. विमानातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास टाकला. राजकीय नेते, उद्योगपती आणि प्रशासकीय अधिकारी त्या विमानात होते. विमानात राज्यमंत्री सुरेश धस, आ. अब्दुल सत्तार, इंड्रीस हाऊजरचे अधिकारी, उद्योगपती नहार, डॉ. कानन येळीकर यांच्यासह उद्योगपती उल्हास गवळी, तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे आदी अधिकारी होते. धावपट्टीवरील थरारातून सुटल्यानंतर राज्यमंत्री धस आणि आ. सत्तार यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी ते जेटच्या व्यवस्थापनाकडे गेले, तर उर्वरित प्रवाशांनी बालंबाल बचावलो असे म्हणत विमानतळ सोडले. च्जेट एअरवेजच्या प्रशासकीय सूत्रांनुसार तांत्रिक कारणांमुळे विमानाने ‘हार्ड लँडिंग’ केली, ज्यामुळे प्रवाशांना जोरदार धक्का बसला; पण विमानाने धावपट्टी सोडली नव्हती. च्वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. शिवाय नवीन प्रवासी असतात, त्यांना धक्का बसल्यासारखे वाटत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. या प्रकाराबद्दल कुणीही तक्रार केली नसल्याचे जेटच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. विमानाला ३ तास उशीर च्जेटचे ते विमान ३ तास अ‍ॅप्रनवर होते. त्या विमानाची परत जाण्याची वेळ ८.३० वाजेची होती. मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आहे का याची चाचपणी करण्यासाठी ते अ‍ॅप्रन थांबविण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तो अनुभव भयावह च्उद्योगपती उल्हास गवळी यांनी तो १५ सेकंदांचा क्षण लोकमतशी बोलताना व्यक्त केला. च्ते म्हणाले, विमान डाव्या बाजूने झुकल्याचे जाणवले. च्विमानाने धावपट्टी सोडली असती तर मोठा अपघातही झाला असता; मात्र पायलटच्या नियंत्रणामुळे व प्रवाशांच्या सुदैवाने तसे काहीही झाले नाही. च्मी अनेक वर्षांपासून विमानाने प्रवास करतो; मात्र आजच्या लँडिंगचा अनुभव भयावह होता.