शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचा ‘ लठ्ठपणा’ चिंतेचा

By admin | Updated: August 30, 2014 22:56 IST

बालकांमध्ये वाढत असलेला ‘लठ्ठपणा’ (स्थूलता) एक सामाजिक समस्या ठरत आहे.

सुरेश लोखंडे - ठाणो
बालकांमध्ये वाढत असलेला ‘लठ्ठपणा’ (स्थूलता)  एक सामाजिक समस्या ठरत आहे. यामुळे शालेय जीवनापासूनच या बालकांना शारीरिक व सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला बाल्यावस्थेतच संपवण्यासाठी बालकांना  सकस पोषण आहार देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
मुले जाड असल्यामुळे त्यांना इतर मुले चिडवतात. त्यामुळे ते घाबरून घरातच बसतात. तासन्तास एकांतात बसून खेळत राहिल्यामुळेदेखील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला लागतो. याशिवाय खाण्यापिण्याच्या अयोग्य निवडीमुळे लहान वयातच मुलांचा बांधा अवाढव्य होतो. पौगंडावस्थेतही तो तसाच राहतो. मुले वयात आल्यानंतरही ही स्थूलता कायम राहिल्यामुळे सुमारे 2क्-25 वर्षे वयोगटातील मुलांना डायबीटिस, हायपरटेंशन, किडनी विकार आदींना सामोरे जावे लागते. या समस्येला संपविण्यासाठी बालकांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
या जनजागृतीसाठी 1 सप्टेंबरपासून सुरू होणा:या ‘राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह’ कालावधीत  बालकांच्या आहाराकडे आई - वडिलांचे लक्ष केंद्रित  करणो हिताचे ठरणार आहे. 
खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धती व निवडीमुळे धावपळीच्या काळात फास्ट फूड  व तयार अन्नपदार्थ खाण्याकडे सर्वाचा जास्त कल आहे. याशिवाय व्यायामाचा अभाव असून विद्यार्थी तासन्तास अभ्यास, कॉम्प्युटर गेम, व्हिडीओ गेम आणि टीव्हीसमोर बसून राहिल्यामुळेदेखील मुलांमध्ये स्थूलता वाढत आहे. याशिवाय अनुवंशिकतेमुळेही मुले स्थूल होत आहेत.  स्थूलतेच्या या जाडपणामुळे  मित्र, मैत्रिणी चिडवत असल्यामुळे मुलांचा स्वाभिमान दुखावला जातो. यामुळे ते इतरांप्रमाणो मिळून-मिसळून राहत नाहीत. मुक्तपणो वावरण्याऐवजी ते घाबरून एकांतात, घरात राहणो पसंत करतात.  यामुळे  मुलांच्या मानसिकतेवर व व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होताना दिसून येत असल्याचे ठाणो सिव्हिल रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ शीतल सत्यजीत नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्थूल असलेल्या मुलाचे वजन कमी करून ते नियंत्रित कसे ठेवायचे, आहार कसा द्यायचा, बालकांमधील सुदृढता कशी जोपासायची आदीसाठी ठाणो सिव्हिल रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्या नियंत्रणात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात मोठय़ा संख्येने सहभागी होण्यासाठी सिव्हिल रुग्णालयाच्या  माता-बालसंगोपन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आहारतज्ज्ञ शीतल नागरे यांनी केले आहे. 
 
यामुळे स्थूलता कमी करता येते 
लहान मुलांवर शिक्षकांचा प्रभाव  मोठय़ा प्रमाणावर होतो. यामुळे शैक्षणिक विकासाकडे लक्ष देत असतानाच शिक्षकांनी विद्याथ्र्याना आरोग्य शिक्षण, योग्य खाण्यापिण्याच्या सवयींची माहिती देणो योग्य ठरेल. शाळेत मैदानी खेळाचा एकतरी तास असायला हवा.
 
यामुळे विद्यार्थी मैदानी खेळाकडे वळतील. पालकांनी मुलांचे समुपदेशन करून मुलांना आहार व त्याचे महत्त्व पटवून देणो आवश्यक आहे. स्वत: खाण्यापिण्याच्या योग्य सवयी अंगी बाळगणो आवश्यक आहे. शरीर वाढीकरिता योग्य प्रमाणात पिष्टमय पदार्थ (काबरेदके) व प्रथिने यांचा आहारात समावेश करणो महत्त्चाचे आहे. मर्यादेत खाल्लेले पिष्टमय पदार्थ आपल्या हालचाली व योग्य वाढीकरिता उपयुक्त ठरतात. परंतु जी जास्त  पिष्टमय पदार्थ खाल्लेली असतात ती शरीरातील चरबीच्या स्वरूपात साठवली जातात. म्हणून योग्य प्रमाणातच पिष्टमय पदार्थ घेणो गरजेचे आहे.
 
च्मुलांना हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ, डाळी यांचा तृणधान्याबरोबर समावेश करून दिवसभराचा आहार ठरवावा. चॉकलेट, आइसक्रीम, चीज, बटर, पिङझा यांचा अति वापर टाळणो हिताचे. 
च्याशिवाय पालेभाज्या आधी निवडून स्वच्छ धुतल्यानंतर कापणो, पीठ न चाळता वापरणो, जास्तीतजास्त अख्खे धान्य वापरणो, मिक्स धान्याचा वापर करून मुगाची खिचडी, थालीपीठ आदी, तर इडली,  उतप्पा आदी आंबवलेल्या पदार्थाचा आहारात वापर, पॉलिश न केलेले धान्य वापरणो, भांडय़ावर झाकण ठेवूनच भाजा शिजवाव्या, पाककृतीमध्ये तिळाचा वापर करावा.
 
मुले जाड असल्यामुळे त्यांना इतर मुले चिडवतात. त्यामुळे ते घाबरून घरातच बसतात. तासन्तास एकांतात बसून खेळत राहिल्यामुळेदेखील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला लागतो. 
खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धती व निवडीमुळे धावपळीच्या काळात फास्ट फूड व तयार अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे स्थूलपणा वाढतो.