शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मुलाच्या नादाने बापही बिघडला

By admin | Updated: June 22, 2016 02:14 IST

पायाला झालेल्या दुखापतीमुळे नोकरी सोडल्यानंतर मुलाच्या संगतीने गुन्हेगार बनलेल्या माथाडी कामगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : पायाला झालेल्या दुखापतीमुळे नोकरी सोडल्यानंतर मुलाच्या संगतीने गुन्हेगार बनलेल्या माथाडी कामगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या कुटुंबासह इतर एका टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून घरफोडीच्या ४८ गुन्ह्यांची उकल केली असून ३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू असताना दोन सराईत टोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे निरीक्षक अशोक राजपूत व युनिट ३ चे निरीक्षक नंदकुमार पिंजण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. त्यापैकी युनिट ३ च्या पथकाने अटक केलेल्या टोळीमध्ये बाप-लेकांचाच समावेश आहे. महादेव व्हनकोरे (४८) असे या माजी माथाडी कामगाराचे नाव असुन किसन (२०) व सचिन (२२) दोघे त्याची मुले आहेत. त्यांना घणसोली दर्ग्यासमोरून अटक करण्यात आली असून ते पनवेलचे राहणारे आहेत. महादेव याने एपीएमसी मार्केटमध्ये १६ वर्षे माथाडी कामगाराची नोकरी केल्यानंतर १५ वर्षांपूर्वी पायाला दुखापत झाल्यामुळे नोकरी सोडली. यानंतर काही वर्षांनी कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवल्यामुळे त्याचा मुलगा किसन हा गुन्हेगारीकडे वळला होता. कालांतराने वडिलासह मोठ्या भावाने देखील त्याला साथ दिली. त्यानुसार मुलांनी चोरुन आणलेल्या दागिन्यांची तो विल्हेवाट लावायचा. त्याने चोरीचे दागिने स्वत:चे भासवून स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँक तसेच पनवेलचे पटेल ज्वेलर्स, सोलापूरचे कालिका ज्वेलर्स व कोपरखैरणेतील महादेव ज्वेलर्स याठिकाणी विकले अथवा गहाण ठेवले होते. त्यांनी केलेल्या २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. युनिट १ च्या पथकाने दुसऱ्या टोळीकडून २५ गुन्ह्यांची उकल करुन १९ लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये राजकुमार पांचाळ (३४), मेहमुद अन्सारी ऊर्फ पप्पू (४६), मनोज केशरवाणी (३२), अनिल केशरवाणी (३०) व नरसिंग चौहाण (२८) यांचा समावेश आहे. सर्व जण कल्याण व भिवंडी परिसरातील राहणारे असून दिवसा घरफोडी करायचे, तसेच चोरीचे दागिने मुत्थुट किंवा मन्नपुरम फायनान्समध्ये अथवा सोनाराकडे गहाण ठेवायचे. ही टोळी दिवसा घरफोड्या करण्यात सराईत आहे.दोन्ही पथकांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून एकूण ४८ गुन्ह्यांची उकल करून ३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्यासह दोन्ही पथकाचे तपास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.