शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आभासी जगात हरवतेय बालपण!

By admin | Updated: July 7, 2017 02:44 IST

मैत्रिणीला पटवण्यासाठी नोबितासह त्याच्या मित्रांची चाललेली खटपट... डोरेमॉनने जियानपासून वाचण्यासाठी नोबिताला गॅझेट दिलेले असताना

प्रज्ञा केळकर-सिंग/ लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मैत्रिणीला पटवण्यासाठी नोबितासह त्याच्या मित्रांची चाललेली खटपट... डोरेमॉनने जियानपासून वाचण्यासाठी नोबिताला गॅझेट दिलेले असताना त्याने त्याचा केलेला गैरवापर... हवेत सायकल उडवून शिवाने केलेला पराक्रम... जीटीएवाय सीटी या गेममध्ये गाड्या चोरणारा, पोलिसांना मारणारा मुलगा... सीओसी गेममध्ये दोन समूह बनवून भांडणारी मुले, असे आभासी जग चिमुरड्यांना हवेहवेसे वाटू लागले आहे. या आभासी जगात मुलांचे बालपण हरवत असून, ही धोक्याची घंटा असल्याची भीती मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.कार्टून पाहून किंवा गेम खेळून चार वर्षांचा चिमुरडा घरात असभ्य भाषा वापरू लागल्यावर किंवा हिंसकपणे वागू लागल्यावर पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. चिमुरड्याचा विकास चुकीच्या पद्धतीने होत असल्याची अचानक जाणीव होते. मात्र, सुरुवातीला आपणच मुलांना मोबाईलची, टीव्हीची सवय लावल्याचे पालक विसरतात व त्यांच्या भविष्याची चिंता करू लागतात. आजकाल घराघरांत हे चित्र दिसू लागले आहे.गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला. मोबाईल, संगणक हे आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. एकत्र कुटुंबांची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली आहे. आई-वडील दोघेही नोकरदार असल्याने त्यांच्याकडे मुलांसाठी पुरेसा वेळ नसतो. अशा वेळी विरंगुळा म्हणून लहान मुलांच्या हाती मोबाईल सोपवला जातो. खेळणे म्हणूनच मुलांना मोबाईलची आणि टीव्हीची ओळख करून दिली जाते. या आभासी जगात रमणारी मुले समाजापासून दुरावत आहेत. त्यांच्यातील विध्वंसक प्रवृत्ती वाढीस लागत असून, आरोग्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.एकलकोंडेपणा, नकारात्मकता येतेयवास्तव जगाशी मुले संबंध जोडू  शकत नसल्याने ती एकलकोंडी, चिडचिडी होतात. त्यांच्यात नकारात्मकता वाढीस लागते. गेममधील क्रियेचे, कार्टूनमधील पात्राचे अनुकरण करीत असताना सातत्याने शिव्या देणे, मारामारी करणे असे घातक बदल मुलांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करू लागले आहेत. स्पायडरमॅन, बॅटमॅनप्रमाणे मी कुठेही चढू शकतो, उंचावरून खाली उडी मारू शकतो, एक बटण दाबून हवी ती गोष्ट घडवून आणू शकतो, शक्तीचा वापर करून समोरच्याला इजा पोहोचवू शकतो, अशा विचित्र कल्पना मुलांच्या मनात घर करू लागल्या आहेत.सर्जनशीलता, कल्पकतेवर परिणामयाबाबत माहिती देताना बालरोगतज्ज्ञ  डॉ. शिरीष गुळवणी म्हणाले, ‘‘मोबाईल, टीव्हीने मुलांचे आयुष्य व्यापून टाकले असून, ही विनाशाची घंटा आहे. आभासी जगात वावरण्याची सवय लागल्याने मुलांमधील शिक्षणाची, विकासाची प्रक्रिया, सर्जनशीलता, कल्पकता लोप पावत आहे. मोबाईल, टीव्हीची सवय अफूच्या गोळीप्रमाणे असून त्याचे विपरीत परिणाम समोर येऊ लागले आहेत. मोबाईलमधील किरणांमुळे मुलांमध्ये कर्करोगाच्या पेशी निर्माण होण्याची शक्यता वाढते. पालकांचे मुलांवर नियंत्रण राहिलेले नाही. या सवयीपासून मुलांना परावृत्त करायचे असेल, तर पालकांनी संवाद वाढविणे, मुलांना घरातील लहानसहान कामांमध्ये सामावून घेणे आवश्यक बनले आहे. मात्र, सध्याचा समाज संवेदनशून्य आणि निष्प्रभ झाला आहे. पालकांनी वेळीच स्वत:ला व मुलांना सावरणे गरजेचे बनले आहे.’’सतत मोबाईल अथवा टीव्हीमध्ये रमल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने पालकांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यातून पाणी येणे, लाल होणे, खाजणे असे त्रास सुरू होतात. कमी वयात चष्मा लागण्याची शक्यता निर्माण होते. मैदानी खेळ न खेळता अधिक वेळ टीव्ही पाहण्यात घालवल्यामुळे मुलांचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी मैदानी खेळ खेळण्यास पसंती दिली पाहिजे. बौद्धिक विकासाला चालना देणारे खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे.- डॉ. शिरीष गुळवणी, बालरोगतज्ज्ञआई-वडील लहान वयातच मुलांच्या हाती मोबाईल सोपवतात. मोबाईल, टीव्हीमध्ये रमण्याची सवय लागल्याने मुले चिडचिडी, हट्टी बनतात. यामुळे सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास, टीम वर्क, शेअरिंग आदी बाबींपासून मुले वंचित राहतात. मुलांमध्ये स्वमग्नतेची लक्षणे दिसू लागतात. यामुळे सामाजिकीकरण, भाषिक विकासाला मर्यादा येतात. यामुळे आई-वडील हतबल होतात. मोबाईल, टीव्हीच्या दुष्परिणामांबाबत अद्याप संशोधन झालेले नाही. मुलांना यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने समुपदेशन, प्ले थेरपी, आवडीनिवडी बदलणे, वर्तनसुधार तंत्र आदी उपचार पद्धतींचा वापर केला जातो.- डॉ. उज्ज्वल नेने, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, केईएम हॉस्पिटल