शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे

By admin | Updated: January 18, 2016 00:52 IST

आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे,

प्राची मानकर, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल. तसेच पालक आणि समाज यांच्यातसुद्धा अभिरुची निर्माण झाली पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल, असे मत बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का, या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘आजचे बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का?’ या विषयावरील परिसंवाद आचार्य अत्रे रंंगमंदिरात झाला. या वेळी सुरेश सावंत, माणिक वड्याळकर, डॉ. कांचन सोनटक्के, राजीव तांबे, स्वाती राजे, रमेश तांबे, महावीर जोंधळे या परिसंवादात सहभागी झाले होते. डॉ. डी. वाय. पाटीलच्या प्राचार्या रेखा पाठक, विश्वास वसेकर उपस्थित होते.आजचे बालसाहित्य सकस आहे का, सकस असेल तर ते अधिक सकस कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच बालसाहित्य हा विषय शाळेमध्ये स्वतंत्रपणे अभ्यासला गेला पाहिजे. यामुळे बालसाहित्याला एक वेगळीच दिशा मिळेल, असे स्वाती राजे यांनी सांगितले.तांबे म्हणाले, ‘‘विज्ञान प्रयोग, विज्ञान भय, पर्यावरण असे वेगळे आशय असणारे साहित्य मुलांना वाचायला मिळाले, तर यामध्ये सकसता येईल. तसेच जी मुले नव्याने लिहीत आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना काय लिहिण्यापेक्षा कसे लिहावे, हे शिकविले पाहिजे. बालरंगभूमीमध्ये सकसता आहे की नाही या विषयावर चर्चा करताना, त्यांचे तंत्र काय, याचा अभ्यास केला पाहिजे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.