शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे

By admin | Updated: January 18, 2016 00:52 IST

आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे,

प्राची मानकर, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल. तसेच पालक आणि समाज यांच्यातसुद्धा अभिरुची निर्माण झाली पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल, असे मत बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का, या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘आजचे बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का?’ या विषयावरील परिसंवाद आचार्य अत्रे रंंगमंदिरात झाला. या वेळी सुरेश सावंत, माणिक वड्याळकर, डॉ. कांचन सोनटक्के, राजीव तांबे, स्वाती राजे, रमेश तांबे, महावीर जोंधळे या परिसंवादात सहभागी झाले होते. डॉ. डी. वाय. पाटीलच्या प्राचार्या रेखा पाठक, विश्वास वसेकर उपस्थित होते.आजचे बालसाहित्य सकस आहे का, सकस असेल तर ते अधिक सकस कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच बालसाहित्य हा विषय शाळेमध्ये स्वतंत्रपणे अभ्यासला गेला पाहिजे. यामुळे बालसाहित्याला एक वेगळीच दिशा मिळेल, असे स्वाती राजे यांनी सांगितले.तांबे म्हणाले, ‘‘विज्ञान प्रयोग, विज्ञान भय, पर्यावरण असे वेगळे आशय असणारे साहित्य मुलांना वाचायला मिळाले, तर यामध्ये सकसता येईल. तसेच जी मुले नव्याने लिहीत आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना काय लिहिण्यापेक्षा कसे लिहावे, हे शिकविले पाहिजे. बालरंगभूमीमध्ये सकसता आहे की नाही या विषयावर चर्चा करताना, त्यांचे तंत्र काय, याचा अभ्यास केला पाहिजे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.