शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बालमृत्यूंची गंभीर दखल

By admin | Updated: September 24, 2016 03:00 IST

राज्यभर खळबळ माजली असताना या गंभीर प्रश्नावर सरकारच्या असंवेदनशील धोरणाची सर्वत्र नाचक्की होत आहे.

पालघर : जिल्ह्यातील ६०० बालमृत्यूंबाबत राज्यभर खळबळ माजली असताना या गंभीर प्रश्नावर सरकारच्या असंवेदनशील धोरणाची सर्वत्र नाचक्की होत आहे. उच्च न्यायालयापाठोपाठ राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने याबाबत राज्य शासनाला नोटीस बजावून या बालमृत्यूच्या धक्कादायक आणि लक्षणीय संख्येबाबत जाब विचारला आहे. मयत बालकाच्या घरी उशिरा भेट देणारे पालघरचे पालकमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कुपोषित बालकाच्या आईने भेटण्यास विरोध दर्शवला होता. याच दरम्यान, सवरा यांनी ६०० बालकांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वाढत्या बालमृत्यूंबाबत आधी उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करीत प्रत्येक बाबतीत न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका, असे सांगून सरकारवर ताशेरे ओढले होते. गुरुवारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या बालमृत्यूंची गंभीर दखल घेऊन सरकारला जाब विचारल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडितांनी सांंगितले.कुपोषणासोबतच रोजगारनिर्मिती आणि स्थलांतर रोखण्यासाठी श्रमजीवी संघटना फिल्डवर युद्धपातळीवर काम करत असून आता याबाबत न्यायालयात आणि आयोगाकडेही सरकारची असंवेदनशीलता सिद्ध करण्यासाठी संघटना पुढे असेल, असे पंडित यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी) >अहवाल सादर कराया प्रकरणात आता न्यायालयात आणि मानवी हक्क आयोगातही श्रमजीवी संघटना सहभागी होणार असून सरकारची असंवेदनशीलता आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या केसमध्ये आदिवासी जनतेची बाजू श्रमजीवी मांडणार असल्याचे संघटनेचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषण निर्मूलनासाठी सरकार तत्कालीन आणि दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना करतेय आणि करणार आहे, याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे निर्देश मानवी हक्क आयोगाने सरकारला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.