शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

बालमृत्यूंची गंभीर दखल

By admin | Updated: September 24, 2016 03:00 IST

राज्यभर खळबळ माजली असताना या गंभीर प्रश्नावर सरकारच्या असंवेदनशील धोरणाची सर्वत्र नाचक्की होत आहे.

पालघर : जिल्ह्यातील ६०० बालमृत्यूंबाबत राज्यभर खळबळ माजली असताना या गंभीर प्रश्नावर सरकारच्या असंवेदनशील धोरणाची सर्वत्र नाचक्की होत आहे. उच्च न्यायालयापाठोपाठ राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने याबाबत राज्य शासनाला नोटीस बजावून या बालमृत्यूच्या धक्कादायक आणि लक्षणीय संख्येबाबत जाब विचारला आहे. मयत बालकाच्या घरी उशिरा भेट देणारे पालघरचे पालकमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कुपोषित बालकाच्या आईने भेटण्यास विरोध दर्शवला होता. याच दरम्यान, सवरा यांनी ६०० बालकांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वाढत्या बालमृत्यूंबाबत आधी उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करीत प्रत्येक बाबतीत न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका, असे सांगून सरकारवर ताशेरे ओढले होते. गुरुवारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या बालमृत्यूंची गंभीर दखल घेऊन सरकारला जाब विचारल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडितांनी सांंगितले.कुपोषणासोबतच रोजगारनिर्मिती आणि स्थलांतर रोखण्यासाठी श्रमजीवी संघटना फिल्डवर युद्धपातळीवर काम करत असून आता याबाबत न्यायालयात आणि आयोगाकडेही सरकारची असंवेदनशीलता सिद्ध करण्यासाठी संघटना पुढे असेल, असे पंडित यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी) >अहवाल सादर कराया प्रकरणात आता न्यायालयात आणि मानवी हक्क आयोगातही श्रमजीवी संघटना सहभागी होणार असून सरकारची असंवेदनशीलता आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या केसमध्ये आदिवासी जनतेची बाजू श्रमजीवी मांडणार असल्याचे संघटनेचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषण निर्मूलनासाठी सरकार तत्कालीन आणि दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना करतेय आणि करणार आहे, याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे निर्देश मानवी हक्क आयोगाने सरकारला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.