शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आघाडी तोडण्याचे पाप मुख्यमंत्र्यांचेच !

By admin | Updated: September 27, 2014 00:57 IST

आर. आर. पाटील : लोकसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी

सांगली : राज्यातील आघाडी तुटण्याच्या पापाला काँग्रेस आणि विशेषत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. ते महाराष्ट्रात आल्यापासून दोन्ही पक्षांतील दुरावा वाढतच गेला होता. राष्ट्रवादीचा एकही मंत्री मनमोकळेपणे काम करीत नव्हता. मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांचा वापर कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी होत होता, अशा शब्दात आज, शुक्रवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथील पत्रकार बैठकीत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, लोकसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासून राष्ट्रवादीला नाउमेद करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. राष्ट्रवादीला बाजूला करून देश व राज्यपातळीवर एकमेव मित्र काँग्रेसने गमावला आहे. जागावाटपाच्या चर्चेला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतच थांबवून ठेवले. कोणत्याही अटी न घालता त्यांच्यामागे फरफटत या, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारी होती. वस्तुत: मुख्यमंत्र्यांवर सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी होती. मालेगाव, नंदुरबार, नवापूर या मतदारसंघातील आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसने तेथील उमेदवारांच्या नावाची एकतर्फी घोषणा केली. मुंबईत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून मुख्यमंत्री चव्हाण स्वत:च्या मतदारसंघात निघून गेले. त्यामुळे आघाडी तोडण्यात राष्ट्रवादीचा दोष नसून त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. १९९९ मध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढले, तेव्हाही राष्ट्रवादीचे ५८ आमदार होते. आता ७० मतदारसंघात पक्षाकडे शक्तिशाली नेते आहेत. ही संख्या वाढू शकते. त्यामुळे आघाडी तुटण्याचा राष्ट्रवादीला फटका बसणार नाही. उलट या निवडणुकीत काँग्रेस व भाजपला किंमत मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)