शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मुख्यमंत्र्यांचा मंगळवारपासून पाहणी दौरा

By admin | Updated: August 30, 2015 02:46 IST

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील दुष्काळी भागाचा एक सप्टेंबरपासून दौरा करणार असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन झाले. सरकार पैशांची कोणतीही

लोणी/अहमदनगर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील दुष्काळी भागाचा एक सप्टेंबरपासून दौरा करणार असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन झाले. सरकार पैशांची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चारा छावण्या नेत्यांसाठी कुरण ठरू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. कृषी विभाग व प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक समूहातर्फे प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी दिन, विविध पुरस्कार वितरण तसेच शहरात पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.फडणवीस म्हणाले, की राज्य दुष्काळात सापडले आहे. सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यासाठी दौरा करणार आहे. सरकारने वर्षभरात शेतकऱ्यांना ७ हजार कोटींची मदत केली. मात्र त्यातून शेतकरी समृद्ध होत नाही. त्यासाठी राज्य दुष्काळमुक्त करणे, ही आपली दिशा असली पाहिजे. जलयुक्त शिवार योजना त्यासाठीच हाती घेतली आहे. योजनेतून पाणलोटाचा विकास करीत विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले जात आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी हे ७० च्या दशकातच ओळखले होते. केटीवेअरसारख्या योजनांतून त्यांनी सहकार उभा केला, मात्र आघाडी सरकारने दिशा बदलली ते मोठ्या धरणांच्या मागे लागले. धरण पूर्ण झाले की भरण होत नाही, म्हणून धरणे पूर्ण होऊ दिली नाहीत, अशी टीकाही त्यांनी आधीच्या सरकारवर केली. ३०० कोटींची जलयुक्त शिवारची कामे जनतेने स्वत:च्या पैशांतून केली. स्वातंत्र्योत्तर काळात असे प्रथमच घडल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)खोऱ्यांतील पाण्याचे नियोजन : खोऱ्यांचा उपखोरेनिहाय अभ्यास केला जाईल. त्यातून अधिकचे पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. २००४ मध्ये जलसंपत्ती नियमन आयोग झाला. मात्र त्याची पहिली बैठक मी मुख्यमंत्री झाल्यावर घेतली, एवढे जलनियोजनाकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. आम्ही राजकीय विरोधक, शत्रू नव्हे!लोकशाहीत आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नव्हे, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना लोणी येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. विखे यांच्या भाजपा प्रवेशाची शंकाही व्यक्त झाली. चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न फडणवीस आणि विखे यांनी केला.ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की समाजकारण व राजकारणात जी अस्पृश्यता वाढत चालली आहे, ती भयंकर आहे. आरक्षणापेक्षा सध्या दुष्काळाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. दुष्काळातून माणसे वाचली तर आरक्षणाचा मुद्दा येईल. मराठवाड्याचा दुष्काळ राजकीय असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.