शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मुख्यमंत्र्यांचा तोडगा : चंद्रकांतदादांचा फसलेला फॉर्म्युला, रस्त्यांचे ‘अ‍ॅन्युईटी’ निकष बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:52 IST

सरकार व खासगी कंत्राटदारांच्या ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी’ने १० हजार किलोमीटरचे रस्ते ३२ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी ठरविलेल्या फॉर्म्यूल्याला कंत्राटदारांनी पूर्णत: पाठ दाखविल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करीत हा फॉर्म्यूला बदलला आहे.

यदु जोशी मुंबई : सरकार व खासगी कंत्राटदारांच्या ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी’ने १० हजार किलोमीटरचे रस्ते ३२ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी ठरविलेल्या फॉर्म्यूल्याला कंत्राटदारांनी पूर्णत: पाठ दाखविल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करीत हा फॉर्म्यूला बदलला आहे.राज्य सरकारने ४० टक्के निधी द्यावा आणि कंत्राटदार कंपन्यांनी आपल्या खिश्यातून ६० टक्के निधी द्यावा. राज्य सरकार कंत्राटदारांना त्यांचा पैसा १५ वर्षांत परत करेल, असे आधी ठरले होते. मात्र, या फॉर्म्यूल्यानुसार काम करण्यास कुठल्याही कंपनीने उत्सुकता दाखविली नाही. त्यावर अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन काही बदल करण्याचे आदेश दिले.आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, राज्य सरकारचा वाटा ६० टक्के असेल आणि कंत्राटदार हे ४० टक्के आर्थिक भार उचलतील. कंत्राटदार दोन वर्षांत आपला हिस्सा देतील, त्याची परतफेड राज्य सरकार नंतरच्या दहा वर्षांमध्ये करेल. दर सहा महिन्यांनी ही परतफेड करण्यात येणार आहे. आधी ती दरवर्षी करण्यात येणार होती. या शिवाय, आधी एक काम किमान १०० किलोमीटरचे असेल असे ठरले होते आता ते ५० किलोमीटर करण्यात येणार असून या बदलास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता लवकरच घेण्यात येणार आहे. आधी कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी फसलेल्या या योजनेला आता फॉर्म्यूला बदलल्याने गती मिळण्याची अपेक्षा आहे.रक्कम कर्जरोख्याने-‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी’द्वारे राज्यातील १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यावर ३२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य शासनाचा सुरुवातीचा सहभाग म्हणून ७ हजार ५०० कोटी रुपये कर्जरोख्यांच्या रुपाने उभारण्यात येणार आहेत.पुलांसाठी १६०० कोटी रु.राज्यातील पुलांची देखभाल, दुरुस्ती व पुनर्बांधणी यावर १६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही रक्कम हुडकोकरून कर्जरुपाने घेण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील