शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘गृहनिर्माण'च्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा सेनेशी घरोबा

By admin | Updated: September 3, 2016 01:27 IST

गृहनिर्माण धोरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ घेत पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना

- यदु जोशी, मुंबई

गृहनिर्माण धोरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ घेत पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्रितपणे लढतील या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले. २०१२ मधील निवडणुकीत २२७ पैकी शिवसेनेने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस ५२, भाजपा ३१, मनसे २८, राष्ट्रवादी काँग्रेस १३ आणि इतर २८ असे संख्याबळ त्यावेळी होते. त्यानंतर २०१४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक भाजपा-शिवसेना एकत्रितपणे लढले मात्र, विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले आणि युतीची सत्ता आली. देशासाठी आणि राज्यासाठी मुंबई महापालिका युतीच्या हाती राहणे अत्यावश्यक असल्याची जाणीव उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनादेखील आहे. राज्य मंत्रिमंडळाचा गाडा हाकताना मुख्यमंत्र्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. सरकार चालविताना शिवसेनेचे चांगले सहकार्य हवे असेल तर शिवसेनेसाठी नाजूक विषय असलेल्या मुंबई महापालिकेत त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकणे राजकीय शहाणपणाचे होणार नाही, हे मुख्यमंत्री जाणतात. सरकारच्या यशाचे श्रेय जसे मुख्यमंत्र्यांना मिळते तसे अपयशाचे श्रेयदेखील त्यांचेच. अशावेळी उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि तो अंगलट आला तर त्याचे खापरही मुख्यमंत्र्यांवर फुटेल. त्याऐवजी सन्मानाने युती करण्यावरच मुख्यमंत्र्यांचा भर असेल असे राजकीय जाणकारांना वाटते. भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा युतीबाबतचा आदेशही महत्त्वाचा असेल. शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, युतीला भाजपा श्रेष्ठी हिरवा झेंडा दाखवतील का, या बाबत साशंकता आहे. तथापि, तशी परिस्थिती उद्भवल्यास मुख्यमंत्री कौशल्य पणाला लावतील, असेही मानले जाते. मुंबईतील भाजपाच्या काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची खुमखुमी आहे. मात्र, तसे झाल्यास भाजपाला सत्तेजवळ आणण्याची कुवत त्यांच्यापैकी कोणामध्येही नाही. आज मुंबईसाठीचे गृहनिर्माण धोरण जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीचे गणित समोर ठेवूनच उद्धव ठाकरे यांची सोबत घेतली. या धोरणाला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मातोश्रीवर मान्यतेसाठी पाठविले होते. गृहनिर्माण धोरणाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत वाटून घेतले. सेनेला एकटे पाडण्यासाठी प्रसंगी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेणे म्हणजे २५ वर्षांपासूनच्या मित्राला (शिवसेना) दूर लोटणे असेल. ही जोखीम राज यांच्यासाठी घेण्याइतपत त्यांची मुंबईत ताकद नाही. शिवाय त्यांना सोबत घेतल्याने हिंदी भाषिक मतदार आमच्यापासून दुरावेल, असे मत भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.सरकारमध्ये भाजपा-शिवसेनेत समन्वयाचा अभाव होता. अलिकडे उद्धव ठाकरे, सेनेचे मंत्री आणि प्रतोदांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करण्याचा ठोस प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर दर तीन महिन्यांनी समन्वयाची अशी बैठक घेण्याचे ठरविले. ही देखील युतीसाठीची मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी असल्याचे बोलले जाते. - राज्यात एकत्रितपणे सत्तेत राहायचे आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र एकमेकांवर वाट्टेल तसे आरोप करायचे असे चित्र युतीसाठी योग्य नाही, असा भाजपा आणि शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यामुळेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीला युती म्हणून सामोरे जावे, असा विचार प्रबळ होताना दिसत असून खुद्द मुख्यमंत्रीच त्या भूमिकेचे असल्याचेही म्हटले जाते.- मुंबई महापालिकेत भाजपा-शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले तर त्याचा परिणाम इतर महापालिका आणि त्याच सुमारास असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींवरदेखील होईल.