शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

‘गृहनिर्माण'च्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा सेनेशी घरोबा

By admin | Updated: September 3, 2016 01:27 IST

गृहनिर्माण धोरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ घेत पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना

- यदु जोशी, मुंबई

गृहनिर्माण धोरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ घेत पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्रितपणे लढतील या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले. २०१२ मधील निवडणुकीत २२७ पैकी शिवसेनेने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस ५२, भाजपा ३१, मनसे २८, राष्ट्रवादी काँग्रेस १३ आणि इतर २८ असे संख्याबळ त्यावेळी होते. त्यानंतर २०१४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक भाजपा-शिवसेना एकत्रितपणे लढले मात्र, विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले आणि युतीची सत्ता आली. देशासाठी आणि राज्यासाठी मुंबई महापालिका युतीच्या हाती राहणे अत्यावश्यक असल्याची जाणीव उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनादेखील आहे. राज्य मंत्रिमंडळाचा गाडा हाकताना मुख्यमंत्र्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. सरकार चालविताना शिवसेनेचे चांगले सहकार्य हवे असेल तर शिवसेनेसाठी नाजूक विषय असलेल्या मुंबई महापालिकेत त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकणे राजकीय शहाणपणाचे होणार नाही, हे मुख्यमंत्री जाणतात. सरकारच्या यशाचे श्रेय जसे मुख्यमंत्र्यांना मिळते तसे अपयशाचे श्रेयदेखील त्यांचेच. अशावेळी उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि तो अंगलट आला तर त्याचे खापरही मुख्यमंत्र्यांवर फुटेल. त्याऐवजी सन्मानाने युती करण्यावरच मुख्यमंत्र्यांचा भर असेल असे राजकीय जाणकारांना वाटते. भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा युतीबाबतचा आदेशही महत्त्वाचा असेल. शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, युतीला भाजपा श्रेष्ठी हिरवा झेंडा दाखवतील का, या बाबत साशंकता आहे. तथापि, तशी परिस्थिती उद्भवल्यास मुख्यमंत्री कौशल्य पणाला लावतील, असेही मानले जाते. मुंबईतील भाजपाच्या काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची खुमखुमी आहे. मात्र, तसे झाल्यास भाजपाला सत्तेजवळ आणण्याची कुवत त्यांच्यापैकी कोणामध्येही नाही. आज मुंबईसाठीचे गृहनिर्माण धोरण जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीचे गणित समोर ठेवूनच उद्धव ठाकरे यांची सोबत घेतली. या धोरणाला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मातोश्रीवर मान्यतेसाठी पाठविले होते. गृहनिर्माण धोरणाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत वाटून घेतले. सेनेला एकटे पाडण्यासाठी प्रसंगी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेणे म्हणजे २५ वर्षांपासूनच्या मित्राला (शिवसेना) दूर लोटणे असेल. ही जोखीम राज यांच्यासाठी घेण्याइतपत त्यांची मुंबईत ताकद नाही. शिवाय त्यांना सोबत घेतल्याने हिंदी भाषिक मतदार आमच्यापासून दुरावेल, असे मत भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.सरकारमध्ये भाजपा-शिवसेनेत समन्वयाचा अभाव होता. अलिकडे उद्धव ठाकरे, सेनेचे मंत्री आणि प्रतोदांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करण्याचा ठोस प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर दर तीन महिन्यांनी समन्वयाची अशी बैठक घेण्याचे ठरविले. ही देखील युतीसाठीची मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी असल्याचे बोलले जाते. - राज्यात एकत्रितपणे सत्तेत राहायचे आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र एकमेकांवर वाट्टेल तसे आरोप करायचे असे चित्र युतीसाठी योग्य नाही, असा भाजपा आणि शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यामुळेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीला युती म्हणून सामोरे जावे, असा विचार प्रबळ होताना दिसत असून खुद्द मुख्यमंत्रीच त्या भूमिकेचे असल्याचेही म्हटले जाते.- मुंबई महापालिकेत भाजपा-शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले तर त्याचा परिणाम इतर महापालिका आणि त्याच सुमारास असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींवरदेखील होईल.