शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सर्किट बेंचच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही

By admin | Updated: April 3, 2015 07:51 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती : कोल्हापूरचा टोल रद्द करणारच..!

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झाली असून, लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर टोलमुक्त करण्याची बांधीलकी आमची आहे. मूल्यांकन झाले की, ‘आयआरबी’ला कसे पैसे द्यायचे याचे नियोजन झाले असून, लवकरच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.सर्किट बेंचच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, हा प्रस्ताव कॅबिनेटपुढे नेण्यासाठी स्वत: पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे हाही प्रश्न मार्गी लागण्यास काहीच अडचण वाटत नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. शासनाने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला जातो. सरकारने या प्रस्तावास मंजुरी देणे हा यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण सरकारने घेतलेला निर्णय न्याय यंत्रणेवर बंधनकारक असतो. त्यामुळे सर्किट बेंच स्थापन होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे स्पष्ट झाले. सर्किट बेंच स्थापन करण्यासंबंधीच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने न्यायाधीश सोनक, हरदास व रणजित मोरे यांची त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष बेंच सुरू होण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू होऊ शकेल.मंत्री पाटील म्हणाले, टोलची दरवाढ करारानुसार झालेली आहे. पूर्वीच्या सरकारने जो करार केला होता, त्यानुसार दरवाढ झाली असून, जोपर्यंत टोल रद्द होत नाही तोपर्यंत कराराप्रमाणे ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. टोल रद्द करण्याचे वचन आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेले आहे. आम्ही त्याच्याशी बांधील असून, प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीच्या खर्चाचा अहवाल आल्यानंतर गतीने हा प्रश्न मार्गी लावू. याबाबत आमदार चंद्रदीप नरके व आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात विषय ताणून धरला होता. यावर बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गतीने काम करीत असून, थोड्याच दिवसांत मूल्यांकनाचा अहवाल प्राप्त होईल, असे सांगितले आहे. या अधिवेशनातच हा प्रश्न निकालात काढणार होतो; पण अधिवेशन येत्या चार-पाच दिवसांत संपणार असल्याने लवकरच हा प्रश्न सोडवू, हेच या प्रश्नाचे व्यावहारिक उत्तर होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. अधिवेशनाचे कामकाज चांगले झाले असून, विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे. विरोधकांच्या आग्रहाखातर एक आठवडा अधिवेशनाचा कालावधी वाढविला. महत्त्वाचे सेवा हमी विधेयक सोमवारी (दि. ६) चर्चेसाठी येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी महेश जाधव, बाबा देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)