शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बळीराजा संघटनेतर्फे मुख्यमंंत्र्यांचा निषेध

By admin | Updated: November 27, 2014 00:24 IST

भेट नाकारली : नजरकैदेत ठेवल्याचा आरोप

कऱ्हाड : ‘ऊसदरासह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने काळे झेंडे दाखविण्याचे आम्ही जाहीर केले होते़ त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मला नजरकैदेत ठेवले़ दरम्यान प्रशासनाने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेसाठी दहा मिनिटे वेळ देतो, असे सांगितले़ मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ दिला नाही़ त्यामुळे आम्ही प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला आहे,’ अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांनी मंगळवारी दिली़ मुख्यमंत्री मंगळवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते़ त्यावेळी बळीराजा संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील व त्यांचे सहकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काळे झेंडे दाखविणार होते़ त्याची माहिती देताना पाटील म्हणाले, ‘पोलिसांना आमच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मला नजरकैदेत ठेवले़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने मला विमानतळावर दहा मिनिटे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले़ मुख्यमंत्री विमानतळावर आल्यावर आम्ही त्यांना भेटलो; मात्र चर्चा झाली नाही़ आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे़ त्यात उसाच्या पहिल्या हप्त्याचा तोडगा तातडीने काढावा, शेतकऱ्यांना शेतीपंपाला दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा, शेतीसाठी मजूर मिळत नसताना रोजगार हमीतील कामांसाठी मजुरांची घातलेली अट शिथील करून यंत्रणा वापरून कामे करण्यास परवानगी द्यावी, शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़’ (प्रतिनिधी)