शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे मिशन जलयुक्त शिवार

By admin | Updated: December 4, 2014 02:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले

यदु जोशी, मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.पावसाचे पाणी शिवारातच अडविणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे आणि दुष्काळी भागातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. या मिशनसंदर्भात पहिली बैठक ५ डिसेंबरला सह्णाद्री अतिथीगृहावर होणार असून त्यास अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. लोकोपयोगी आणि राज्य हिताच्या बाबींसाठी सहकार्यही देऊ, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी दूरगामी उपाययोजनांवर २० टक्के तर मदत आणि पुनर्वसनावर तब्बल ८० टक्के निधी खर्च होतो. दुष्काळी मदत ही तात्पुरती मलमपट्टी असते. ही परिस्थिती नेमकी उलटी करून दूरगामी योजनांवर ८० टक्के तर अपरिहार्यता म्हणून मदतीवर २० टक्के निधी खर्च व्हावा आणि पुढे पुढे तो आणखी कमी व्हावा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान राबविले जाणार आहे.