शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन शिक्षा’

By admin | Updated: January 19, 2015 06:22 IST

अपराधसिद्धता म्हणजे फौजदारी खटल्यांमधील आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध होण्याचा दर (कन्व्हिक्शन रेट) देशातील इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात फारच कमी

यदु जोशी, मुंबईअपराधसिद्धता म्हणजे फौजदारी खटल्यांमधील आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध होण्याचा दर (कन्व्हिक्शन रेट) देशातील इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात फारच कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर तो वेगाने वाढविण्यासाठी नवे धोरण आणण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. त्यांच्या आदेशानुसार यासंदर्भात गृह विभागाने एक प्रस्ताव तयार केला असून, लवकरच तो राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी येईल.बिहारसारख्या राज्याचा अपराधसिद्धतेचा दर महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत हा विषय गृह विभागाने ऐरणीवर घेऊनदेखील महाराष्ट्राचा दर १५ टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ शकलेला नाही. हे लक्षात घेता आता हा विषय मुख्यमंत्र्यांनी अजेंड्यावर घेतला आहे. माहीतगार सूत्रांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, एखाद्या गुन्ह्यात तपास व अपराधसिद्धतेसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा ‘मुख्यमंत्री पदक’ देऊन दरवर्षी सन्मान करण्यात येणार आहे. ज्या सरकारी वकिलांकडील खटल्यांत गुन्हासिद्धतेचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसेल त्यांना पुन्हा सरकारी वकील म्हणून नेमले जाणार नाही. प्रत्येक पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील खटल्यांसाठी खासगी वकील नेमण्याचा अधिकार असेल. त्यामुळे पोलीस यंत्रणेला केवळ सरकारी वकिलांवर विसंबून राहावे लागणार नाही. महिलांवरील अत्याचार बरेचदा समोर येत नाहीत, आलेच तर त्यांची नोंद नीट केली जात नाही. हा आजवरचा अनुभव लक्षात घेता आता त्रिस्तरीय उपाययोजना केली जाणार आहे. त्यानुसार, महिला अत्याचारांविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांना ‘मुख्यमंत्री निर्भय अ‍ॅवॉर्ड’ दिले जाईल. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष अधिकाऱ्यांनाही असे अ‍ॅवॉर्ड दिले जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येक शिफ्टमध्ये दोन याप्रमाणे किमान सहा महिला शिपाई नियुक्त असतील. त्यामुळे एखादी महिला कधीही पोलीस ठाण्यात गेली तरी तिचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी महिला पोलीस त्या ठिकाणी असेल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना महिला सुरक्षा समिती स्थापन करावी लागेल आणि तिची दर महिन्याला बैठक होईल.मृत्यूपूर्व जबानी घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे अनेक त्रुटी राहतात. म्हणून या अधिकाऱ्यांना नागपूरच्या न्यायिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव आहे.