शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘क्लस्टर’ लागू करण्यात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा अडसर

By admin | Updated: September 21, 2016 04:02 IST

ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला

कल्याण : ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला आहे. आता जर विकास करायचा असेल, तर आठ एफएसआय द्यावा लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा बांधकामे नियमित करण्याची घोषणा ही पोकळ आणि अशक्यप्राय असल्याची टीका माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी कल्याण, कांबा येथील मेळाव्यांत केली.या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कल्याण पश्चिमेचे अध्यक्ष संदीप देसले, नगरसेवक जव्वाद डोण, कुणाल पाटील, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ग्रामीणचे नेते अर्जुन चौधरी, वंडार पाटील आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, ‘बांधकामे नियमित करण्याचा निर्णय एखादा ग्रामपंचायतीचा सरपंचही घेणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असा निर्णय घेतात, हे हास्यास्पद आहे. भाजपाने केवळ थापा मारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थापाडे आहेत. त्यांचाच कित्ता राज्याचे मुख्यमंत्री गिरवत आहेत. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्याला मंजुरी आघाडी सरकारने दिली होती. आम्ही केलेल्या कामांची भूमिपूजने भाजपा करत आहे. पालकमंत्री असताना मी कामे केली नाहीत, असा भाजपाचा आरोप चुकीचा असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे सरकार ड्युप्लिकेट सरकार आहे.’ ‘नवी मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छ आहे. ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या महापालिकांत शिवसेनेची सत्ता आहे. त्याला भाजपाची साथ आहे. आमच्या पालिकेतील कारभाराची चौकशी करायची असेल, तर शिवसेना-भाजपाच्या ताब्यातील महापालिकांची अगोदर चौकशी करण्यात यावी आणि त्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी. त्याचे आॅडिट करावे,’ या मागणीचा पुनरूच्चार नाईक यांनी केला. >पंतप्रधान मोदींवर टीकाभाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत-पाकमध्ये एक लहानचे युद्ध घडवून आणतील. त्याचा वापर निवडणुकीत करतील, असाही आरोप नाईक यांनी केला.