शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

‘क्लस्टर’ लागू करण्यात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा अडसर

By admin | Updated: September 21, 2016 04:02 IST

ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला

कल्याण : ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला आहे. आता जर विकास करायचा असेल, तर आठ एफएसआय द्यावा लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा बांधकामे नियमित करण्याची घोषणा ही पोकळ आणि अशक्यप्राय असल्याची टीका माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी कल्याण, कांबा येथील मेळाव्यांत केली.या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कल्याण पश्चिमेचे अध्यक्ष संदीप देसले, नगरसेवक जव्वाद डोण, कुणाल पाटील, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ग्रामीणचे नेते अर्जुन चौधरी, वंडार पाटील आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, ‘बांधकामे नियमित करण्याचा निर्णय एखादा ग्रामपंचायतीचा सरपंचही घेणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असा निर्णय घेतात, हे हास्यास्पद आहे. भाजपाने केवळ थापा मारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थापाडे आहेत. त्यांचाच कित्ता राज्याचे मुख्यमंत्री गिरवत आहेत. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्याला मंजुरी आघाडी सरकारने दिली होती. आम्ही केलेल्या कामांची भूमिपूजने भाजपा करत आहे. पालकमंत्री असताना मी कामे केली नाहीत, असा भाजपाचा आरोप चुकीचा असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे सरकार ड्युप्लिकेट सरकार आहे.’ ‘नवी मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छ आहे. ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या महापालिकांत शिवसेनेची सत्ता आहे. त्याला भाजपाची साथ आहे. आमच्या पालिकेतील कारभाराची चौकशी करायची असेल, तर शिवसेना-भाजपाच्या ताब्यातील महापालिकांची अगोदर चौकशी करण्यात यावी आणि त्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी. त्याचे आॅडिट करावे,’ या मागणीचा पुनरूच्चार नाईक यांनी केला. >पंतप्रधान मोदींवर टीकाभाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत-पाकमध्ये एक लहानचे युद्ध घडवून आणतील. त्याचा वापर निवडणुकीत करतील, असाही आरोप नाईक यांनी केला.