शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश

By admin | Updated: December 12, 2014 02:45 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात दुष्काळ असताना आपण स्वत: भोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार नाही आणि तुम्हीही करू नका, असे त्यांनी सहकारी मंत्र्यांना बजावले आहे.
नागपूरमध्ये सध्या ब:यापैकी थंडी असल्याने साग्रसंगीत भोजनावळींस प्रारंभ झाला आहे. मंत्री, सचिव, अधिवेशन काळात दाखल झालेले लब्धप्रतिष्ठीत, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार आदींना निमंत्रित केले जाते. राज्यातील 19 हजारांहून अधिक गावात दुष्काळ असताना दिल्या जाणा:या भोजनावळी हा टीकेचा विषय होऊ शकतो, अशी भीती वाटल्याने हे आदेश दिल्याची चर्चा आहे.
 कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांचे दारु पिऊन कर्मचा:यांना मारहाण करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यात मंत्र्यांच्या भोजनावळीत असा एखादा प्रकार घडला तर आणखी नामुश्की होईल, अशी शंका वाटल्यानेही हे आदेश सुटल्याचे समजते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तिरुपतीवारीवरील विमान खर्चाचा विषय चर्चेत आला.
 राज्यात दुष्काळ असताना भाजपाने एका मंत्र्याच्या विमानवारीवर खर्च का केला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. दीर्घ काळानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्याने नातलग, मित्रपरिवार, मतदारसंघातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने नागपूरमध्ये आले आहेत. अशावेळी त्यांच्या सन्मानार्थ भोजनाचा कार्यक्रम केला नाही तर नाराजी व्यक्त होऊ शकते, अशी भीती एका शिवसेना मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)