शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश

By admin | Updated: December 12, 2014 02:45 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात दुष्काळ असताना आपण स्वत: भोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार नाही आणि तुम्हीही करू नका, असे त्यांनी सहकारी मंत्र्यांना बजावले आहे.
नागपूरमध्ये सध्या ब:यापैकी थंडी असल्याने साग्रसंगीत भोजनावळींस प्रारंभ झाला आहे. मंत्री, सचिव, अधिवेशन काळात दाखल झालेले लब्धप्रतिष्ठीत, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार आदींना निमंत्रित केले जाते. राज्यातील 19 हजारांहून अधिक गावात दुष्काळ असताना दिल्या जाणा:या भोजनावळी हा टीकेचा विषय होऊ शकतो, अशी भीती वाटल्याने हे आदेश दिल्याची चर्चा आहे.
 कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांचे दारु पिऊन कर्मचा:यांना मारहाण करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यात मंत्र्यांच्या भोजनावळीत असा एखादा प्रकार घडला तर आणखी नामुश्की होईल, अशी शंका वाटल्यानेही हे आदेश सुटल्याचे समजते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तिरुपतीवारीवरील विमान खर्चाचा विषय चर्चेत आला.
 राज्यात दुष्काळ असताना भाजपाने एका मंत्र्याच्या विमानवारीवर खर्च का केला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. दीर्घ काळानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्याने नातलग, मित्रपरिवार, मतदारसंघातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने नागपूरमध्ये आले आहेत. अशावेळी त्यांच्या सन्मानार्थ भोजनाचा कार्यक्रम केला नाही तर नाराजी व्यक्त होऊ शकते, अशी भीती एका शिवसेना मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)